MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Attari Railway Station
Kitchen Tips
Indoor Bedrooms Plants
EPFO WhatsApp Services
8th Pay Commission
Samsung Galaxy S26 FE
Soft Idli Tips
Thailand Visa Free Travel
Kitchen Cleaning Hacks
Indian Artisans at Antilia
Nita Ambani Ganapati Look
Sanju Samson
Salman Khan
Tata Punch & Punch EV Prices
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Chanakya Niti : नवरा गरीब असला तरी चालेल, पण चाणक्यांनी सांगितलेले हे ५ गुण त्याच्यात नक्की बघा!

Chanakya Niti : नवरा गरीब असला तरी चालेल, पण चाणक्यांनी सांगितलेले हे ५ गुण त्याच्यात नक्की बघा!

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. फक्त पहिल्या भेटीत आवडला, दिसायला भारी आहे, हेअरस्टाईल छान आहे किंवा पगार चांगला आहे म्हणून जोडीदार निवडणं चुकीचं ठरू शकतं. मग जोडीदार निवडताना नक्की काय पाहावं?

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 17 2026, 03:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
चाणक्य नीती: लग्नाआधी या ५ गोष्टी नक्की तपासा
Image Credit : AI

चाणक्य नीती: लग्नाआधी या ५ गोष्टी नक्की तपासा

आजकाल अनेक जण फक्त मुलाचा पगार, नोकरी आणि संपत्ती बघून लग्नाला होकार देतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजून घ्यायचा असेल, तर तो रोजच्या आयुष्यात कसा वागतो हे पाहणं गरजेचं आहे. विशेषतः राग आल्यावर तो कसा वागतो, इतरांचा आदर करतो का आणि जबाबदाऱ्या कशा पार पाडतो, यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होते. फक्त पैसा आणि नोकरी बघून लग्न केलं, तर ते नातं फार काळ टिकत नाही.

चाणक्यांनी सांगितलेले ते ५ गुण कोणते?

आचार्य चाणक्यांनी जोडीदार निवडताना व्यक्तीचा स्वभाव आणि चारित्र्याला खूप महत्त्व दिलं होतं. आजच्या काळातही त्यांचे हे विचार खूप मार्गदर्शक ठरतात. लग्नाचा निर्णय घेताना एकमेकांना समजून घेणं, मोकळेपणाने बोलणं आणि एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे जोडीदाराचा खरा स्वभाव पाहिल्यानंतरच लग्नाचा निर्णय घ्या.

तुम्ही जर एखाद्याला आपला जीवनसाथी म्हणून निवडणार असाल, तर त्याच्यात हे ५ गुण आहेत की नाही ते नक्की तपासा आणि मगच तुमचा निर्णय सांगा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
१. तो इतरांशी कसा वागतो?
Image Credit : Gemini

१. तो इतरांशी कसा वागतो?

एखादा मुलगा तुमच्याशी कसा वागतो, यावरून त्याचा पूर्ण स्वभाव समजणं कठीण आहे. तो त्याचे आई-वडील, मित्र, ऑफिसमधले सहकारी आणि दुकानातील कामगारांशी कसा बोलतो, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.

इतर लोक बोलत असताना तो त्यांचं ऐकून घेतो का? त्यांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करतो का? इतरांशी वागण्याच्या त्याच्या या सामान्य पद्धतीवरून तुम्हाला त्याच्या खऱ्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतो.

Related Articles

Related image1
Chanakya Niti : सुखी संसारासाठी या ४ गोष्टी पार्टनरला नक्की सांगा, नात्यात कधीच येणार नाही दुरावा
Related image2
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, या 4 परिस्थितीत शांत राहणंच हुशारीचं काम
34
२. कठीण प्रसंगात तो कसा वागतो?
Image Credit : Gemini

२. कठीण प्रसंगात तो कसा वागतो?

सगळं काही चांगलं सुरू असताना शांत राहणं खूप सोपं असतं. पण जेव्हा आयुष्यात एखादं संकट येतं किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हाच माणसाचा खरा स्वभाव बाहेर येतो. एखादी अडचण आल्यावर तो शांतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो का? की लगेच चिडचिड करून इतरांना दोष देतो किंवा भांडायला लागतो, हे नक्की बघा.

लग्नानंतर संसारात अनेक अडचणी येऊ शकतात. त्या दोघांना मिळून सोडवायच्या असतात. अशा वेळी एकमेकांशी संवाद साधणं आणि संयम ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.

44
३. काम आणि जबाबदाऱ्यांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे?
Image Credit : Gemini

३. काम आणि जबाबदाऱ्यांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे?

मुलगा किती पैसे कमवतो, फक्त या एका गोष्टीवर जोडीदार निवडणं योग्य नाही. तो त्याचं काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या किती गांभीर्याने घेतो, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

तो भविष्याचं काही प्लॅनिंग करतो का? स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून पळ काढतो का? या गोष्टींकडे लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते, पण जबाबदारी घेण्याची वृत्ती संसारावर दीर्घकाळ परिणाम करते.

४. महिलांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे?

लग्नाआधी तो महिलांच्या मतांचा आणि स्वातंत्र्याचा किती आदर करतो, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

तो त्याच्या घरातील महिलांशी कसा वागतो हे बघा. सोबतच तो तुमच्या आवडीनिवडी, निर्णय, नोकरी आणि वैयक्तिक गोष्टींचा आदर करतो का, हेही तपासा. समानता आणि एकमेकांचा आदर हाच सुखी संसाराचा पाया असतो.

५. राग आणि वाईट सवयींवर त्याचं नियंत्रण आहे का?

जर मुलाला खूप राग येत असेल, खोटं बोलण्याची सवय असेल, जुगार, जास्त दारू पिणं किंवा इतर कोणतंही व्यसन असेल, तर पुढे जाऊन संसारात खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लग्नाआधी या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल, धमकावत असेल किंवा स्वतःच्या रागीट स्वभावाचं समर्थन करत असेल, तर ही गोष्ट खूप गांभीर्याने घ्या.

संसार सुखाचा होण्यासाठी फक्त पैसा किंवा चांगलं दिसणं पुरेसं नसतं. व्यक्तीचा स्वभाव, जबाबदारीची जाणीव, रागावर नियंत्रण आणि जोडीदाराबद्दलचा आदर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आजकाल अनेक नाती लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोटापर्यंत पोहोचतात. याचं मुख्य कारण म्हणजे लग्नाआधी फक्त बाह्य सौंदर्य, संपत्ती आणि नोकरी बघून घेतलेला निर्णय. म्हणूनच आचार्य चाणक्य सांगतात की, लग्नाआधी मुलामध्ये हे ५ गुण नक्की तपासा आणि मगच पुढचं पाऊल उचला.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Baking Soda Vs Baking Powder : बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय फरक आहे? कधी काय वापरायचं ते जाणून घ्या
Recommended image2
Snake Venom Medicines : जीव घेणारं सापाचं विष आता बनतंय संजीवनी
Recommended image3
Ganpati Visarjan : बाप्पाच्या विसर्जनावेळी निर्माल्य आणि कपड्यांचं काय करायचं?
Recommended image4
Steel Water Bottle : स्टीलची बाटली वापरताय? मग ही चूक अजिबात करू नका
Recommended image5
Curd Storage Tips : फ्रिजमध्ये ठेवलेलं दही खराब होत नाही असा तुमचा समज आहे का? हे नक्की वाचा
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : सुखी संसारासाठी या ४ गोष्टी पार्टनरला नक्की सांगा, नात्यात कधीच येणार नाही दुरावा
Recommended image2
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, या 4 परिस्थितीत शांत राहणंच हुशारीचं काम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved