Accident in Satara : सातारा-सज्जनगड येथे दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघात होत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पिकअप चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे होणारी मंत्रिमंडळ बैठक ६ मे २०२५ रोजी होणार आहे. या बैठकीत विविध विकास प्रकल्पांवर चर्चा होणार असून, जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
Mango Success Story: तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडीच्या शेतकरी सुदर्शन जाधव यांनी द्राक्षबागेच्या बांधावर केशर आंब्याची लागवड करून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्यांना हे यश मिळाले.
मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-इ-हिंद इमारतीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात रविवारी आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला खोटे ठरवले आहे. अशी दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये असा इशारा दिला. सर्व पाकिस्तानी नागरिकांचा शोध लागला असून त्यांना देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाने पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरात सशुल्क दहनभूमी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्रांजवळ जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याचे जाहीर केले.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी शनिवारी पुण्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी बळींना श्रद्धांजली वाहिली आणि शोकसंतप्त कुटुंबियांचे सांत्वन केले.