Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लालबागच्या राजाच्या पहिल्याच दिवशीच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये, अमेरिकन डॉलर्सचा हार आणि क्रिकेट बॅट आढळून आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकर आणि ठाकरे कुटुंबियांसह अनेक मान्यवरांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
Cotton Import: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्कमुक्तीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली. यामुळे कापड उद्योगाला दिलासा मिळाला असला तरी, स्वस्त आयातीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.
Manoj Jarange Patil : हजारो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्याहून मुंबईकडे कूच करत आहेत. 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी जुन्नरमध्ये एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उद्या जरांगेंचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे.
कोल्हापूरमध्ये गणपतीच्या आगमनावेळी एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सुमारे ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. यावेळी भरभूर पाऊस येत होता तरीही महिलांचा उत्साह कमी झाला नाही. त्यामुळे या महिलांचे कौतुक करण्यात येत आहे.
ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या ठाम मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन छेडणार असून, यावेळी ते नेमकं काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.
Maharashtra Rain Alert: २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी उद्धव ठाकरेही कुटुंबासह 'शिवतीर्था'वर आले होते.
Maharashtra