- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! 28 जिल्ह्यांना यलो, काहींना ऑरेंज अलर्ट, ऐन गणेशोत्सवातच पावसाचे धुमशान
Maharashtra Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! 28 जिल्ह्यांना यलो, काहींना ऑरेंज अलर्ट, ऐन गणेशोत्सवातच पावसाचे धुमशान
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Thunderstorms accompanied with lightning ,gusty winds 30-40kmph and heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in ghat areas of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/OQ4vvDD6wj— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 28, 2025
कोकण आणि मुंबई परिसर
मुंबई: शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
पालघर, ठाणे: विजांसह पावसाचा इशारा; यलो अलर्ट.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट.
पश्चिम महाराष्ट्र व घाटमाथा
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर: हलका ते मध्यम पाऊस.
घाटमाथा (पुणे, कोल्हापूर, सातारा): अतिवृष्टीची शक्यता; ऑरेंज अलर्ट.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड: वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस; यलो अलर्ट.
लातूर, धाराशिव: हलका ते मध्यम पाऊस.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर: विजांसह पावसाचा अंदाज; यलो अलर्ट.
नाशिक घाटमाथा: मुसळधार पाऊस होण्याची शक्यता.
विदर्भ
अकोला, अमरावती: वादळी वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा.
भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ: विजांसह वादळी वाऱ्याचा अंदाज; यलो अलर्ट.
नागरिकांसाठी सूचना
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
अनावश्यक प्रवास टाळा.
विजांच्या कडकडाटात घराबाहेर जाणे टाळा.
हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा.
स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
राज्य सरकारने देखील जिल्हा प्रशासनांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

