Anger Psychology : छोट्या गोष्टींवरून राग येतो? यामागे आहेत ही मानसशास्त्रीय कारणं
काही परिस्थितींमध्ये आपला राग पटकन वाढतो. यामागची कारणं समजून घेतल्यास राग नियंत्रणात ठेवणं आणि नाती जपणं सोपं होतं. मानसशास्त्रानुसार माणसाला जास्त राग कधी आणि का येतो, तेच आपण जाणून घेऊया.

माणसाला जास्त राग येण्याची कारणं

अपेक्षा पूर्ण न झाल्यास
मानसशास्त्रज्ञांच्या मते, माणसाला जास्त राग येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्याच्या अपेक्षा पूर्ण न होणं. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाकडून, मित्रांकडून, जोडीदाराकडून आणि सहकाऱ्यांकडून काही अपेक्षा ठेवतो. जेव्हा या अपेक्षा भंग पावतात, तेव्हा निराशा येते. हीच निराशा कधी दुःखात, तर अनेकदा रागात बदलते. केलेल्या कामाची कदर न होणं, कष्टांना मान न मिळणं, विश्वास ठेवलेल्या माणसांनी फसवणं, यांसारख्या घटनांमुळे तीव्र राग येऊ शकतो.
अपमान
मानसिक ताण
झोपेची कमतरता
पुरेशी झोप न मिळणं, भूक आणि शारीरिक थकवा यांचाही रागावर परिणाम होतो, असं अभ्यास सांगतात. पुरेशी झोप झाली नाही, तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची मेंदूची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे, जास्त वेळ भुकेले राहिल्यास शरीरातील साखरेची पातळी कमी होऊन चिडचिड आणि असहिष्णुता वाढू शकते.
दुय्यम भावना
मानसशास्त्रानुसार, राग ही अनेकदा 'दुय्यम भावना' (secondary emotion) असते. म्हणजे, आपण बाहेरून राग दाखवत असलो तरी, आतमध्ये दुःख, भीती, अपमान, एकटेपणा किंवा निराशा लपलेली असू शकते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, अनेकजण आपल्या खऱ्या भावना व्यक्त करता न आल्याने रागीट वागतात. त्यामुळे, एखादी व्यक्ती का रागवली आहे हे जाणून घेण्यासाठी तिची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर, राग ही एक आवश्यक भावना आहे.
अन्याय घडत असताना आवाज उठवण्यासाठी आणि आपले हक्क जपण्यासाठी थोडा राग गरजेचा असतो. पण तो राग आपण कसा व्यक्त करतो, हे महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, राग आल्यावर थोडा वेळ विचार करणे, दीर्घ श्वास घेणे, परिस्थितीकडे दुसऱ्या कोनातून पाहणे, गरज वाटल्यास त्या जागेवरून थोडं दूर जाणे आणि शांतपणे बोलणे यांसारख्या पद्धती वापरता येतात.

