Ashok Chavan Resigns : संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागील सांगितले कारण, पक्षाच्या नेतृत्वावर उपस्थितीत केले प्रश्न

| Published : Feb 13 2024, 10:33 AM IST / Updated: Feb 13 2024, 10:37 AM IST

Sanjay Nirupam
Ashok Chavan Resigns : संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागील सांगितले कारण, पक्षाच्या नेतृत्वावर उपस्थितीत केले प्रश्न
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली यामागील कारण सांगितले आहे. याशिवाय संजय निरुपम यांनी पक्षाच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत.

Ashok Chavan Resigns : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाला (Congress) सोडचिठ्ठी दिली. अशातच काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यामागील कारण सांगितले आहे.

संजय निरुपम यांचे ट्विट
संजय निरुपम यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निरुपम यांनी म्हटले की, "अशोक चव्हाण पक्षासाठी निश्चितच एक संपत्ती होते. कोणी अशोक चव्हाणांना उत्तरदायित्व म्हणत आहेत, कोणी ईडीला जबाबदार धरतायत, या सर्व घाईघाईने दिलेल्या प्रतिक्रिया आहेत. खरंतर महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. यासंदर्भातील माहिती वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांची तक्रार वेळीच गांभीर्याने घेतली असती तर ही वेळ आली नसती.

अशोक चव्हाण कुशल संघटक, जमिनीवर पक्की पकड असलेले नेते आहेत. याशिवाय गेल्या वर्षी नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत संपूर्ण नेतृत्वाने अशोक चव्हाणांची क्षमता प्रत्यक्षात पाहिली होती. त्यांनी काँग्रेस सोडणे आमच्यासाठी मोठा धक्का आहे. याची भरपाई कोणीही करू शकत नाही. त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी केवळ आमचीच होती."

काँग्रेस पक्षातील अशोक चव्हाणांची राजकीय कारकीर्द
काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांची राजकीय कारकीर्द नेहमीच उत्तम राहिली आहे. वर्ष 1986 मध्ये अशोक चव्हाण महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष झाले. वर्ष 1987 ते 1989 पर्यंत लोकसभेच्या खासदार रुपात काम केले. यानंतर वर्ष 1995 पर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस कमेटीचे महासचिव राहिले. 

वर्ष 1999 पासून मे 2014 पर्यंत तीन वेळा आमदार म्हणून निवडले गेले. मे 2014 मध्ये खासदार निवडले गेले. यानंतर 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री रुपात कार्यरत होते. 9 नोव्हेंबर 2010 रोजी काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाणांना आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपांमुळे पदावरुन राजीनामा देण्यास सांगितला होता. 

आणखी वाचा : 

काँग्रेसला आणखी एक मोठा झटका, अशोक चव्हाणांनी दिला राजीनामा, BJP मध्ये प्रवेश करणार?

Baba Siddique Resigns : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी पक्षाला ठोकला रामराम

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव