पुणे येथील कार अपघातातील आरोपीच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समजली आहे. या पुणे येथील माजी नगरसेवक अजय भोसले यांनी हे आरोप केले आहेत.
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. हे सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.
नागपूरमध्ये अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने पतीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून फिरत राहिली.
पुणे येथील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दोन आयटी अभियंत्यांना उडवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित आहेत का, असा प्रश्न माजी आमदार निलेश लंके यांना पडला असून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
रायगडावर ५ व ६ जूनला ३५० वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधत सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.
बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी असून त्या जाणून घ्यायला हव्यात. आपल्याला कमी मार्क्स मिळाले तरी आपण चांगलं करिअर करू शकता हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला हवं.
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.