Sanjay Raut : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून २९ जून रोजी शासन निर्णयाची होळी आणि ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार आहे.
शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत बहिण आणि चुलत भावाची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात ही घटना घडली.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात येत्या 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. अशातच मोर्चासंबंधित एक बॅनर झळकवला असून त्यावर “मराठीसाठी, मातीसाठी, महाराष्ट्रासाठी एक व्हा” असे लिहिले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव परिसरात एका महिला कीर्तनकाराचा मृतदेह आढळला आहे. दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाजपाच्या मेधा कुलकर्णी पुणे स्थानकाच्या नामांतरावरुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बोलताना दिसून येत आहेत. अशातच मस्तानीचं नाव बुधवार पेठेशी जोडणं खालच्या दर्जाचं राजकरण करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पादुका पहिल्यांदाच लंडनमध्ये पोहोचल्या आहेत. ७० दिवसांच्या प्रवासानंतर आणि २२ देशांमधून प्रवास करून ही वारी लंडनमध्ये पोहोचली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लंडनमध्ये पंढरपूरच्या मंदिराची स्थापना केली जाणार आहे.
परभणीतील एका युवकाला २२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. १३ वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून, दंड चुकीचा असल्याचा युवकाचा दावा आहे.
महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीकरणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. अभिनेत्री तेजस्विनी देशपांडे यांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला असून, सोशल मीडियाद्वारे सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीकरणाच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत मोर्चा काढणार असताना, गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलाच्या दरात कपात होणार असल्याची घोषणा केली. या पाठोपाठ आता महावितरण कंपनीनेही मुंबईकरांना स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra