पुणे शहरातील रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. तर भाजपा नेत्या मेधा कुलकर्णी यांनी स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. 

Pune Railway Station Name Change Controversy : पुणे शहराची पुनर्स्थापना करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचं पुण्याच्या इतिहासात मोलाचं योगदान आहे. आदिलशहाने पुणे बेचिराख करून "येथे पुन्हा मानवी वस्ती होणार नाही" अशी शपथ घेतली होती. परंतु, राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात आल्या आणि या शहराच्या पुनर्वसनासाठी सोन्याचा नांगर फिरवून नव्या आत्मविश्वासाने लोकांना स्थायिक केलं. पुण्याचा पुनर्जन्म राजमाता जिजाऊ यांच्या धैर्य व दूरदृष्टीमुळेच शक्य झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आज पुण्याचा कायापालट झालेला आहे, त्यामागे फक्त राजमाता जिजाऊंचं योगदान आहे, असं ठाम मत व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचं नाव राजमाता जिजाऊ स्टेशन असावं, ही मागणी यथार्थ व योग्य आहे.

शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची निर्मिती केली, पुण्याचा विकास घडवून आणला. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांसारखा महान नेता घडवला, ज्यामुळे पुढे पेशवे, सरदार आणि मराठा साम्राज्य घडू शकलं. ही “मी लढू शकतो, मी राज्य चालवू शकतो” ही भावना राजमाता जिजाऊंनी निर्माण केली.

त्यामुळे भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे स्टेशनला देण्याची मागणी केल्यावर त्याला जोरदार विरोध करण्यात आला आहे.मराठा इतिहासाचा अभ्यास केला असता, त्यांनी ही मागणीच केली नसती, असा प्रतिवाद करण्यात आला.

मेधा कुलकर्णी यांची बाजीराव पेशव्यांच्या नावाची मागणी

मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं की, "पुणे शहर शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या अग्रस्थानी आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मराठा साम्राज्याचे चिन्ह दिसले पाहिजे. म्हणून मी थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे."

त्यांनी पुढे सांगितलं, “अटक ते कटक या मर्यादेपर्यंत हिंदवी साम्राज्याचा विस्तार करणारे थोरले बाजीराव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे खरे शिलेदार होते. ४२ लढाया लढून एकही हरले नाहीत. आजही त्यांच्या युद्धकौशल्याचे धडे NDAसारख्या संस्थांमध्ये शिकवले जातात.”या दोन्ही बाजूंच्या भूमिकेमुळे **पुणे रेल्वे स्थानकाचं नाव कोणाच्या नावाने असावं, यावर सध्या मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.

संभाजी ब्रिगेड आणि आरपीआयचा महात्मा फुलेंसाठी आग्रह

मात्र, या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेड आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांनी स्थानकाचे नाव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली आहे. शिक्षण आणि महिला तसेच मागासलेल्या समाजाच्या हक्कांसाठी लढलेले समाजसुधारक फुले हे पुण्याच्या 'ज्ञानभूमी' या ओळखीचे अधिक प्रतिनिधित्व करतात, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

आरपीआय नेते सचिन खरात यांनी बाजीरावांच्या नावावर स्थानक ठेवण्यास जोरदार विरोध दर्शवला. ते म्हणाले, "आम्ही आधुनिक पेशवाईचे उदात्तीकरण करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला विरोध करतो. शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि त्यांच्या जयंती उत्सवाची परंपरा सुरू करणारे महात्मा फुले होते. फुलेंच्या योगदानामुळेच पुणे 'ज्ञानभूमी' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे स्थानकाला त्यांचेच नाव दिले पाहिजे."

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.