मुंबई - आज दुपारपासून नारळी पौर्णिमा तिथीनुसार सुरु होणार आहे. हा सण कोकण आणि मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी होणार्या या सणाचे वेगळेच महत्त्व आहे. जाणून घ्या पूजा विधी आणि तिचे महत्त्व.
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Central Railway Special Trains: रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, मडगाव, कोल्हापूर आणि पुणे या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडल्याचा दावा केला आहे.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हा हप्ता वितरित केला जाईल.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून, रक्षाबंधनपूर्वी हप्ता मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील २७ हजार सातबाऱ्यांवरील सुधारित नोंदी चौकशीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. टंकलेखनाच्या चुकांपुरते मर्यादित न राहता, नावे, क्षेत्रफळ, शेरे आणि वारसांबाबतच्या नोंदींमध्ये बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
गडचिरोली-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून, भरधाव ट्रकने पाच मुलांना चिरडले आहे. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत.
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विभागाने दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नावाची ऑर्डर काढली आहे. यामुळे बेस्टचा महाव्यवस्थापक नेमण्याची खरी जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टीसीएसच्या कर्मचार्यांसाठी एक सकारात्मक बातमी आहे. टीसीएसने सुमारे ८० टक्के कर्मचार्यांसाठी पगारवाढीची घोषणा केली आहे. कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे दिसून येते.
Maharashtra