Uddhav Thackeray Speech: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला "नॅपकीन"ची उपमा देत त्यांनी पक्षाला "पोरं नसल्याचा" टोला लगावला आणि शिवसैनिकांचे आभार मानले.
भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील आमदार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासून लोक येत असतात आणि काही वेळा अंघोळीपूर्वीच त्यांना भेटी द्याव्या लागतात.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदार आणि खासदारांना खास डिनर मीटिंगसाठी मुंबईत आमंत्रित केले आहे. पक्षांतर्गत गळती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
मुंबई विद्यापीठाने आपला शैक्षणिक दर्जा आणि जागतिक स्पर्धात्मकतेचा नवा टप्पा गाठत QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर 17वे स्थान मिळवले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आदल्या दिवशी आळंदीत इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. घाट परिसर पाण्याखाली गेला असून, प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केल्या आहेत. पावसाचा जोर कायम असला तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम आहे.
या चित्रीकरणासाठी अभिनेते सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि नवोदित अहान शेट्टी हे NDA मध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत निर्माते भूषण कुमार आणि निधी दत्ता तसेच दिग्दर्शक अनुराग सिंग यांचीही हजेरी आहे.
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाने आज (गुरुवार) दुपारी १ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत २,००० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक खोलगट भाग आणि नदीकाठच्या वस्तींसाठी पूरसदृश स्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक मार्ग वळवण्याच्या (diversions) निर्णयामुळे सर्व लेन पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, रस्ता जणू एक "स्थिर वाहतूक जत्रा" बनला आहे.
आता १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी ही प्लेट बसवण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे की, ही मुदत अंतिम आहे.
Maharashtra