
Kolhapur
कोल्हापुरातील पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी असतानाही बॅरिकेड्स हटवून विसर्जन करण्यात आले. स्थानिकांनी पंचगंगा नदीत पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याचे सांगत ही पारंपरिक प्रथा असल्याचा दावा केला. कोविड काळापासून नदीतील विसर्जन बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर नाल्यांचे सांडपाणी, रासायनिक पाणी आणि कारखान्यांचे दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याचा दावा करत केवळ गणेशोत्सवाच्या काळात प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचे स्थानिकांनी म्हटले. गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याबाबत हायकोर्टाचा निकाल आल्यास तो स्वीकारू, असेही सांगण्यात आले.