मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाच्या मुद्यावर सुनावणी दरम्यान आंदोलकांना दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाला छत्रपती संभाजीराजे आणि खासदार शाहू महाराज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने मराठा आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करावे.
मराठा आंदोलकांची प्रवासादरम्यान त्यांच्यात आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, जुहूतील बसच्या काचाफोडी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीएसएमटीसह इतर भाग रिकामे करण्यात आले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस धाडली आहे. यानुसार, जरांगे पाटील यांना मैदान रिकामे करावे असे म्हटले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांकडून बस फोडण्याची आणि प्रवाशाला मारहाण करण्याची घटना घडली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला असून, आरक्षणाची रचना कोलमडेल असा इशारा दिला.
Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर आणि मुंबईतील तणावावर भूमिका मांडली. दुकाने बंद करण्याचा आदेश सरकारने न देता व्यापाऱ्यांनी स्वतःहून दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
Bombay High Court's Stern Order to Maratha Protestors: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याने हायकोर्टाने आंदोलकांना आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील मराठा आरक्षण उपोषणावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल कोर्टाने सरकारला जबाबदार धरले आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे मुंबई जाम झाली आहे. या पार्श्वभूमिवर उच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी झाली.
mumbai