MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Manoj Jarange Patil : उपोषण सोडतानाचा भावुक क्षण! मनोज जरांगे पाटील धायमोकलून रडले, विखे पाटलांनी दिला आधार

Manoj Jarange Patil : उपोषण सोडतानाचा भावुक क्षण! मनोज जरांगे पाटील धायमोकलून रडले, विखे पाटलांनी दिला आधार

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपले. जरांगे पाटलांनी भावुक होत हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आणि महाराष्ट्रातील मराठा समाज एकसंध असल्याचे स्पष्ट केले.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 02 2025, 07:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : social media

मुंबई : मराठा आरक्षणासाठीचा लढा निर्णायक वळणावर आला आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत आठपैकी सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. मंचावरच सरकारचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. भावुक क्षणात त्यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. “हा लढा सोपा नव्हता. पण दोन कोटी मराठा बांधवांच्या पाठिंब्याने हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.”

25
Image Credit : ANI

"महाराष्ट्राला विभागांमध्ये कधी पाहिलं नाही"

जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की, "सातारा गॅझेटच्या आधारावर पश्चिम महाराष्ट्रातील मराठेही आता आरक्षणात सामावतील. मी कधीही महाराष्ट्राला खान्देश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ अशा विभागांमध्ये न पाहता, एकसंध समाज म्हणून पाहतो. म्हणूनच हा लढा समाजाने उचलून धरला." मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांची पाठ थोपटत त्यांच्या लढ्याचं कौतुक केलं.

Related Articles

Related image1
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, मराठा आंदोलनाचा मोठा विजय, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित सोडले उपोषण
Related image2
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय?, त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?; जाणून घ्या संपूर्ण पार्श्वभूमी!
35
Image Credit : fb

"विनंती मान्य झाली, आता लढा जिंकलो"

जरांगे पाटलांनी पुढे स्पष्ट केलं की, "वाशीमध्ये जी घटना घडली, ती पुन्हा घडू नये. तशी वेळ आलीच, तर मी विखे पाटलांच्या घरी जाऊन त्यांना विचारणार आहे. अभ्यासकांनी जर पुन्हा शंका उपस्थित केल्या, तर शासनाने त्यावर शुद्धीपत्रक काढावं." यावर विखे पाटलांनी तत्काळ सहमती दर्शवली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी "आता आपण जिंकलो" असं जाहीर करत उपोषणाचा शेवट केला.

45
Image Credit : social media

मुख्यमंत्र्यांविषयी स्पष्ट भूमिका, "वैर संपेल की सुरूच राहील?"

उपोषणाच्या शेवटच्या क्षणीही मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी आले तर आमचं वैर संपेल. नाही आले तर ते वैर कायम राहील," असं थेट वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी तिन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि एकनाथ शिंदे यांना उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. विखे पाटलांनी त्यांना समजावत सांगितलं की, "आजचा निर्णय महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री लवकरच भेटतील. आता उपोषण संपवा." त्यावर जरांगे पाटलांनी हसत उत्तर दिलं. “उपोषण सुटल्यानंतर मी कुणालाही जवळ येऊ देत नाही!”

55
Image Credit : X

एक ऐतिहासिक लढ्याचा टप्पा पूर्ण

हे आंदोलन केवळ उपोषण नव्हतं, तर एका समाजाच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा आवाज होता. जरांगे पाटलांनी आपल्या शब्दांनी आणि कृतीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, शांततेच्या मार्गानेही इतिहास घडवता येतो.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मनोज जरांगे पाटील
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात SIT स्थापन; महिला आयपीएस तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे तपासाची सूत्रे
Recommended image2
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Recommended image3
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू, लेह-लडाख ट्रिपवरून परतताना दुर्घटना
Recommended image4
Pimpri- Chinchwad Traffic Advisory : चिंचवडमध्ये ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; चापेकर चौक परिसरात रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Recommended image5
Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट; महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना 'हाय अलर्ट', तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
Related Stories
Recommended image1
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, मराठा आंदोलनाचा मोठा विजय, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित सोडले उपोषण
Recommended image2
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय?, त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?; जाणून घ्या संपूर्ण पार्श्वभूमी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved