- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढणार! 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 26 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढणार! 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 26 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) २६ ऑगस्टसाठी राज्यातील १७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. कोकण किनारपट्टीपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाची स्थिती गंभीर बनत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) 26 ऑगस्टसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/jSoyBQAKm2
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमाल तापमान: 28°C
किमान तापमान: 24°C
यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले कोकणातील जिल्हे
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पुणे शहरात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
इतर जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता
धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जाहीर केला आहे.
मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेडला अलर्ट
हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट
उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
विदर्भातही पावसाची जोरदार शक्यता
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या भागांत विजांसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्याशा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
26 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घ्यावी.

