मुंबई-पुणे महामार्गावरील 'मिसिंग लिंक'च्या बोगद्याला तडे जाऊन पाणी गळत असल्याने रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. हा मिसिंग लिंक नसून 'करप्शन लिंकिंग' असल्याचा आरोप करत, त्यांनी नवयुगा आणि ॲफकॉन्स कंपन्यांवर कारवाईची मागणी केली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला झाला. त्यामुळं मुंबई, पुणे आणि मिसिंग लिंकवर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यावेळी मिसिंग लिंक दुर्दशेबाबत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या नवयुगा इंजिनिअरिंग आणि ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांवर तातडीची कारवाई करण्याची मागणी रोहित यांनी केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

काय म्हणाले रोहित पवार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकचे उदघाटन करताना हा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळी राजकीय भूमिका मांडली होती. कामाचा दर्जा हा क्वालिटी असायला हवा यावर रोहित पवार यावेळी बोलले. दोन महिन्यांपूर्वी उदघाटन करण्यात आलेल्या या टनेलची म्हणजेच बोगद्याची दुर्दशा झाली.

आतून पाण्याचे फवारे उडत आहेत 

बोगद्यामध्ये तडे पडले असून आतून बाहेर पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळं हा मिसिंग लिंक करप्शन लिंकिंग असल्याचं यावेळी बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सरकारने नवयुगा आणि ॲफकॉन्स या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी रोहित यांनी केली. आता मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.