सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये २४ तासांत ५१३ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे दरडी कोसळून पाणी साचले आहे. दुसरीकडे, खंडाळा तालुक्यातील आतीट गावात ढगफुटीसदृश पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर येऊन घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

महाबळेश्वर: राज्यात सर्वच भागात विविध विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर सोबतच मागील २४ तासांत चांगला पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर या भागात मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये २४ तासांमध्ये तब्बल ५१३ मिलीमीटर म्हणजेच २० इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महाबळेश्वरमध्ये झाला चांगला पाऊस 

महाबळेश्वरमध्ये चांगला पाऊस म्हणजेच अनेक ठिकाणी पाणी साचलं असून दरडी कोसळल्या आहेत. ग्रामीण भागातील घाटरस्त्यांवर मातीचे ढीग मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. इथं होणारा पाऊस नागरिकांसाठी मात्र गैरसोयीचा ठरला आहे.

खंडाळा तालुक्यात झाला ढगफुटीचा पाऊस 

खंडाळा तालुक्यात ढगफुटीचा पाऊस झाला आहे. या तालुक्यातील आतीट गावात डोंगरातून आलेल्या पाण्यामुळं ओढ्या आणि नाल्या यांना पूर आला आहे. या गावातील नदीचे पाणी घरात घुसल्यामुळं अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतीच काही प्रमाणात नुकसान झालं असून ग्रामस्थांनी मदत मिळावी अशी मागणी केली.