Tulsi Plant : रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये? या ४ चुका टाळाच
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पवित्र मानलं जातं. पण नकळतपणे आपण तुळशीची पूजा आणि काळजी घेताना काही चुका करतो. यात रविवारी आणि एकादशीला पाणी न घालण्यासारख्या महत्त्वाच्या नियमांचा समावेश आहे.

तुळशीला आहे विशेष स्थान
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे बहुतेक हिंदू घरांमध्ये तुळशीचं रोप असतंच. महिला दररोज तुळशीची पूजा करतात. दिवाळीनंतर तुळशीचा सण साजरा केला जातो आणि कार्तिक महिन्यात विशेष पूजा केली जाते. असं म्हणतात की, तुळशीचं रोप सुकणं हे अशुभ संकेत देतं.

समस्या संपत नाहीयेत का?
तुळस फक्त धार्मिकच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. सर्दी-खोकल्यापासून ते अनेक गंभीर आजारांवर तुळशीची पानं रामबाण उपाय आहेत. पण घरात तुळस असूनही तुमच्या समस्या संपत नसतील किंवा सतत आजारपण येत असेल, तर कदाचित तुम्ही नकळतपणे काही चुका करत आहात.
रविवारी आणि एकादशीला पाणी घालू नका
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये. शास्त्रानुसार, या दिवशी तुळस निर्जल व्रत करते. तुम्ही तिची पूजा करू शकता, दिवा लावू शकता, पण या दिवशी पाणी घालणं टाळावं.
नखाने पानं तोडू नका
तुळशीची पानं कधीही नखाने तोडू नयेत. असं करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे नेहमी बोटांच्या साहाय्याने हळूवारपणे पानं तोडावीत. तसेच, सूर्यास्तानंतर तुळशीची पानं तोडण्याची चूक कधीही करू नका.
घाण असू नये
तुळशीच्या रोपाजवळ चप्पल, बूट, केरसुणी किंवा इतर कोणताही कचरा ठेवू नये. तुळशीच्या आसपासची जागा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावी.
तुळशीच्या मंजिरी सोडू नका
तुळशीला आलेल्या मंजिरी (फुलं) तशाच रोपावर सोडू नयेत. त्या काढून भगवान विष्णू किंवा शाळीग्राम यांना अर्पण कराव्यात.
