- Home
- Mumbai
- ICICI बँकेचा बचत खात्यांसाठी किमान शिल्लक ₹50,000 करण्याचा निर्णय, ‘मध्यमवर्गावर मोठा आघात’
ICICI बँकेचा बचत खात्यांसाठी किमान शिल्लक ₹50,000 करण्याचा निर्णय, ‘मध्यमवर्गावर मोठा आघात’
मुंबई - आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांच्या किमान शिल्लक रकमेची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मेट्रो आणि शहरी भागातील बचत खातेदारांनी दरमहा सरासरी ₹50,000 शिल्लक ठेवणे आवश्यक राहील, जीपूर्वी ₹10,000 होती.

ग्रामिण भागासाठीही मर्यादा वाढवली
अर्धशहरी भागातील खातेदारांसाठी किमान सरासरी शिल्लक आता ₹25,000 करण्यात आली असून, ती यापूर्वी ₹5,000 होती. ग्रामीण भागातही किमान शिल्लक ₹2,500 वरून ₹10,000 करण्यात आली आहे.
ही नवीन अट 1 ऑगस्ट 2025 पासून उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यांवर लागू होईल. यूट्यूबर अनुज प्रजापती यांनी याला आयसीआयसीआय बँकेचा “सर्वात वाईट निर्णय” म्हटले असून, या निर्णयावर टीका करणाऱ्यांत ते एकटे नाहीत.
अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना हा निर्णय मध्यमवर्गावर अधिक ओझे टाकणारा असल्याचे म्हटले.
The Worst Decision of ICICI Bank 😡#ICICIBank raises average minimum balance for savings a/c in metros & urban areas to Rs 50,000
Earlier it was Rs 10,000
Why the hell people put their money in accounts. Urban youth wants to invest those money not to sit dead in Bank… pic.twitter.com/FXfdJ27tk8— Anuj Prajapati (@anujprajapati11) August 9, 2025
₹50,000 सरासरी शिल्लक उरत नाही
“महिन्याला ₹1 लाख पगार असलेल्या लोकांकडेही ईएमआय, वीजबिले, कर्जे, क्रेडिट कार्ड खर्च यामुळे ₹50,000 सरासरी शिल्लक उरत नाही. प्रत्येक क्षेत्र फक्त मध्यमवर्गाला लुटण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. गरीब लोक त्यांच्यासाठी फक्त चालते-बोलते मृतदेह आहेत आणि सरकारसुद्धा तसेच आहे,” असे एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले.
“आयसीआयसीआय बँकेने बचत खाते हा आता लक्झरीचा विषय बनवला,” असे आणखी एकाने म्हटले.
“मध्यमवर्गावर आणखी एक आघात”
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शमा मोहम्मद यांनी याला “मध्यमवर्गावर आणखी एक आघात” असे संबोधले. “आता इतकी मोठी रक्कम न ठेवल्यास लोकांना दंड आकारला जाईल,” असे त्यांनी लिहिले.
अनेकांनी हेही नमूद केले की, ज्यांच्याकडे महिन्याला ₹50,000 जास्तीची रक्कम असेल, ते इतक्या कमी व्याज देणाऱ्या बचत खात्यात पैसे का ठेवतील? “2025 मध्ये शहरी तरुणांना 3% व्याज देणाऱ्या खात्यात पैसे सडू द्यायचे नाहीत. त्यांना गुंतवणूक करायची आहे, संपत्ती निर्माण करायची आहे. फक्त बँकांना श्रीमंत बनवायचे नाही,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.
श्रीमंतांसाठी, श्रीमंतांनी, श्रीमंतांचेच!
“ज्या देशात 90% लोकांचा मासिक पगार ₹27,000 पेक्षा कमी आहे, तिथे ₹50,000 किमान शिल्लक ठेवणे. श्रीमंतांसाठी, श्रीमंतांनी, श्रीमंतांचेच!” असे आणखी एका ‘एक्स’ वापरकर्त्याने म्हटले.
काहींनी मात्र आयसीआयसीआय बँकेचे समर्थन केले. खासगी बँकेला स्वतःचे नियम ठरवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. समर्थकांनी हेही स्पष्ट केले की, या किमान शिल्लकवाढीचा परिणाम विद्यमान ग्राहकांवर होणार नाही.

