महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना उबाठा गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात असून, ठाकरे गटाने दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहिलेल्या या खासदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघालं आहे. ऑपरेशन टायगरची सुरु असलेली धावपळ आता थांबली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. हा उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आता ठाकरे गटाकडून या ६ खासदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाईला केली सुरुवात

ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाईला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नाराज असल्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलवली. ६ खासदारांनी बैठकीला दांडी मारल्यामुळं त्यांच्या विरोधात ठाकरे यांच्या पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दिल्लीतील बैठकीला राहिले गैरहजर 

दिल्लीतील बैठकीला खासदार गैरहजर राहिले होते. त्यामुळं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं जाणार आहे. या खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

कोणी सोडली ठाकरेंची साथ 

  • खासदार संजय जाधव – परभणी 
  • खासदार नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली 
  • खासदार संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम 
  • खासदार ओमराजे निंबाळकर – धाराशिव 
  • खासदार भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी 
  • खासदार संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई