Shiv Sena Symbol War : शिवसेनेच्या 'धनुष्य-बाण' चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेली लढाई १६ जुलैला सर्वोच्च न्यायालयात पोहोचणार आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती

मुंबई : शिवसेनेच्या 'धनुष्य-बाण' चिन्हावरून निर्माण झालेला राजकीय संघर्ष निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटामध्ये या चिन्हावरून सुरू असलेली लढत आता १६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमित खंडपीठासमोर सुनावणीसाठी येणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

'धनुष्य-बाण' कुणाचा?

१७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच शिवसेनेचे अधिकृत प्रतिनिधित्व मान्य करत मूळ चिन्ह 'धनुष्य-बाण' त्यांच्याकडे सुपूर्त केले होते. या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली.

लवकर सुनावणीची मागणी, पण कोर्टाचा नकार

२ जुलै २०२५ रोजी, सुट्टीतील खंडपीठासमोर उद्धव सेनेचे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हवाला देत तात्काळ सुनावणीची विनंती केली. मात्र, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने १६ जुलै रोजीच हे प्रकरण नियमित खंडपीठासमोर मांडण्याचे स्पष्ट केले.

Scroll to load tweet…

शिंदे गटाचा युक्तिवाद

शिंदे गटाच्या वकिलांनी तात्काळ सुनावणीला विरोध करत स्पष्ट केलं की, चिन्ह मिळाल्यानंतर दोन मोठ्या निवडणुका (लोकसभा आणि विधानसभा) पार पडल्या असून, यामुळे तातडीने सुनावणी आवश्यक नाही.

पुढचा टप्पा, १६ जुलैचा निकाल महत्त्वाचा!

या प्रकरणाचा पुढील अध्याय १६ जुलै रोजी उघडणार आहे. त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमित खंडपीठासमोर उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यातील या राजकीय संघर्षावर निर्णायक चर्चा होणार आहे.

‘धनुष्य-बाण’ या ऐतिहासिक चिन्हावरचे मालकीहक्काचे युद्ध आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. १६ जुलै रोजीची सुनावणी केवळ दोन गटांमध्येच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठा बदल घडवू शकते.