Mumbai Dahi Handi 2025: मुंबईतील दहीहंडी उत्सवात एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोप बांधण्यादरम्यान तोल जाऊन पडल्याने त्यांचा जीव गेला. या घटनेव्यतिरिक्त ३० गोविंदा जखमी झाले आहेत.
पुण्यातील २५ मंडळांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात डीजेऐवजी पारंपारिक ढोल ताशांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचे प्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले की, उत्सवात सांस्कृतिक रंग आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
कोकणातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई उपनगरासह राज्यातील ठिकठिकाणी पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे हवामान खात्याने मुंबई-रायगडला रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी होणारा दहीहंडी उत्सव हा उत्साह, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी “गोविंदा पथके” एकत्र येतात आणि उंच मनोरे बांधून दहीहंडी फोडतात. यातून शारीरिक व मानसिक आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातील एका ड्रेनेज चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम करत असताना शुक्रवारी तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी सांगितले.
पुण्यात 15 ऑगस्टनिमित्त ड्राय डे घोषित केल्यानंतरही मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला. याशिवाय पबमध्येही मद्यविक्री सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
महाराष्ट्रातील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. पण यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबरपर्यंत HSRP नंबर प्लेट लावता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी भाषण देत काही महत्वाच्या घोषणा देखील केल्या.
भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील विविध भागांचा पावसाचा अंदाज वर्तवला असून, सध्या राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra