Vande Bharat Express: महाराष्ट्राला १३ वी पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मिळणारय, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जातील. ही नवीन गाडी सध्याच्या १०-१२ तासांच्या प्रवासाला केवळ ७ तासांवर आणेल, ज्यामुळे प्रवाशांचा तब्बल ५ तासांचा वेळ वाचणार आहे.
Kolhapur : कोल्हापूर शहरात बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर सुरू असून, विवेकानंद कॉलेज परिसरात एका पोलिसावर हल्ला झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी मोहिम सुरू केली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्णविराम दिला, ही योजना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. योजनेतील अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी E-KYC प्रक्रियेची मुदत पूर संकटामुळे १५ दिवसांनी वाढवली.
Bhopal Model Khushboo Ahirwar Found Dead : भोपाळमध्ये मॉडेल खुशबू अहिरवारच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी कासिम अहमद नावाच्या तरुणावर मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे. मॉडेल त्याच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती.
Viral Tiger Attack on Forest Watcher in Maharashtra : ब्रह्मपुरी फॉरेस्ट गेस्ट हाऊसमधील गार्डवर वाघाने हल्ला केल्याचा सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा करत हा व्हिडिओ एक्स आणि व्हॉट्सॲपसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
Alandi Kartiki Yatra 2025: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 12 ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रेसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
NCP Ajit Pawar fraction remove Rupali Patil and Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतर्गत वादामुळे रुपाली पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवले आहे.
गायिका आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि शाहरुख खान यांच्याबद्दल आपली मते व्यक्त केली, तसेच त्यांच्या आगामी नवीन गाण्याची घोषणाही केली.
Sangali Bailgada Race : सांगलीत पार पडलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेक फेल’ या जोडीने विजेतेपद पटकावून मानाची फॉर्च्युनर गाडी जिंकली.
Maharashtra : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असून 2 डिसेंबरला मतदान होईल.राज्यातील 247 नगरपरिषद व 147 नगरपंचायतींसाठी नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर झालीये.
Maharashtra