मुंबई : पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सहाजिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठीही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.