MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामान खात्याकडून 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामान खात्याकडून 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि चक्रीय वातस्थितीमुळे गुरुवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. अशातच राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 04 2025, 11:22 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
Image Credit : Getty

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात आजपासून (गुरुवार) पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यासोबत चक्रीय वातस्थितीही तयार झाली आहे. या दोन्ही हवामान प्रणालींच्या परिणामामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

25
सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Image Credit : Asianet News

सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर आणि ठाण्यात तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील. मात्र शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि मुंबई-ठाण्यात मध्यम पावसाची शक्यता राहील.

Related Articles

Related image1
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट जारी!
Related image2
महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार गायी-म्हशींच्या खरेदीसाठी अनुदान!
35
कोकण किनारपट्टीसाठी इशारा
Image Credit : iSTOCK

कोकण किनारपट्टीसाठी इशारा

दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यास गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यास गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारपट्टी भागात जोरदार सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. पालघरमध्ये शनिवारीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

45
मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती
Image Credit : Getty

मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह वादळे येण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत आज पाऊस होण्याचा अंदाज आहे. परंतु उद्यापासून या भागातील पावसाचा जोर ओसरत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

55
गणेश विसर्जनानंतर दिलासा
Image Credit : Getty

गणेश विसर्जनानंतर दिलासा

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये हवामानाबाबत उत्सुकता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, गणेश विसर्जनाच्या दिवसानंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे विसर्जनानंतर राज्यात हवामान काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image2
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image3
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image4
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Recommended image5
IT प्रोफेशनलची चांदी! हिंजवडी ते मुंबई थेट 'शिवनेरी' धावणार; प्रवासाचा एक तास वाचणार, पाहा नवा प्लॅन
Related Stories
Recommended image1
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट जारी!
Recommended image2
महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार गायी-म्हशींच्या खरेदीसाठी अनुदान!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved