- Home
- Maharashtra
- पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी; रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली 'डेडलाईन'
पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी; रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली 'डेडलाईन'
Pune-Mumbai Bullet Train Project: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पीक अवर्समध्ये दर १५ मिनिटांनी ट्रेन उपलब्ध असेल.

पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी
पुणे : पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर आता तासांत नाही, तर मिनिटांत मोजले जाणार आहे! बहुप्रतिक्षित 'हायस्पीड बुलेट ट्रेन' प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकल्पाची गती आणि प्रवाशांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधांचा मोठा प्लॅन सादर केला.
५ वर्षांत स्वप्न होणार पूर्ण!
मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता 'मिशन मोड'वर काम सुरू केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार:
मोठे प्रकल्प (बुलेट ट्रेन): पुढील ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
मध्यम प्रकल्प: ३ वर्षांच्या मर्यादेत पूर्ण होणार. मुंबई-पुणे हायस्पीड मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात वेगाने सुरू झाले असून, आगामी ५ वर्षांत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
दर १५ मिनिटांनी बुलेट ट्रेन; प्रवासाचा ताण मिटणार
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांची फ्रिक्वेन्सी (वारंवारता). प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 'मेट्रो' स्टाईल नियोजन केले आहे.
"केवळ ट्रेन धावणार नाही, तर ती प्रवाशांना सहज उपलब्ध असेल. पीक अवर्समध्ये दर १५ ते २० मिनिटांनी एक बुलेट ट्रेन सोडण्याचे आमचे नियोजन आहे," असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांना वेळेचे बंधन राहणार नाही आणि अगदी लोकलसारखीच बुलेट ट्रेनची उपलब्धता असेल.
महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी 'बंपर' निधी
यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर केंद्र सरकारने निधीचा वर्षाव केला आहे.
महाराष्ट्रासाठी तरतूद: २३,९२३ कोटी रुपये.
एकूण प्रकल्प किंमत: राज्यात सध्या सुमारे १.७० लाख कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
काय होणार फायदा?
१. वेळेची बचत: पुणे-मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल.
२. आर्थिक विकास: या हायस्पीड कॉरिडॉरमुळे मार्गालगत औद्योगिक (Industrial) आणि निवासी (Residential) क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
३. कनेक्टिव्हिटी: दर १५ मिनिटांनी ट्रेन असल्याने दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी जागतिक दर्जाची होईल.

