अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी असून, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई | प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाचे ढग गडगडू लागले आहेत. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सागरी वारे सक्रिय, किनारपट्टी भाग सतर्कतेत अरबी समुद्रात तयार झालेलं लो प्रेशर झोन हे दक्षिण गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सागरी वारे प्रचंड वेगाने वाहत असून, कोकणात त्याचा परिणाम जाणवत आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानुसार, पुढील काही तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाळांमध्ये सुट्टीचा विचार शक्य अत्यवस्थ पावसामुळे काही भागात शाळा आणि महाविद्यालयांना सावधगिरी म्हणून सुट्टी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळांच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नागरिकांना सूचना 

अनावश्यक प्रवास टाळा हवामान खात्याने नागरिकांना खोल समुद्रात जाणं, नद्या ओलांडणं, डोंगराळ भागात भटकंती करणं टाळावं, अशा सूचना दिल्या आहेत. झाडांच्या खाली, विजेच्या खांबांखाली थांबू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.