भारताने अग्नि-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. MIRV तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. एप्रिल २०१२ मध्ये त्याची पहिली चाचणी झाली होती. याची रेंज ५००० किलोमीटर आहे.
लोकसभेत ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 मंजूर झाले आहे, ज्यामुळे ईस्पोर्ट्सना चालना मिळणार आहे पण रिअल मनी गेमिंगवर बंदी येणार आहे. या निर्णयामुळे क्रिकेटसह अनेक खेळांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Friendship Story : ही कथा सुरिंदर गुप्ता आणि सुखदेव वालिया यांच्या मैत्रीची आहे, जी एका संकटाच्या क्षणी सुरू झाली. न्यू ऑर्लिन्स मध्ये गुप्ता कुटुंबावर आलेल्या संकटात वालिया यांनी त्यांना मदत केली आणि त्यातून एक अतूट मैत्रीचे बंधन निर्माण झाले.
गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर गंभीर गुन्हेगारी आरोप असल्यास त्यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव असलेली विधेयके सविस्तर अभ्यासासाठी संयुक्त समितीकडे पाठवण्यात येतील.
नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना Z श्रेणीची सुरक्षा आहे. ही भारतातली VIP आणि VVIP साठी असलेल्या पाच प्रकारच्या सुरक्षापैकी तिसरी मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या कानशिलात लगावण्यात आली.
बुधवारी सकाळी सिव्हिल लाइन्स येथील आपल्या अधिकृत निवासस्थानी 'जनसुनवाई' कार्यक्रमात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
हिमाचल प्रदेशचे मंत्री आणि बुशहर राजघराण्याचे वारस विक्रमादित्य सिंह दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. त्यांचा विवाह डॉ. अमरीन कौर यांच्याशी होणार असून त्या चंदीगड येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहेत. विवाह सोहळा २२ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे.
सकाळचा आढावा : मुंबईत मुसळधार पाऊस, जनजिवन विस्कळीत, शाळा कॉलेज बंद, ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, सकाळी ८ वाजेपर्यंतच्या ५ मोठ्या बातम्या जाणून घेऊया.
ओरॅकलने आपल्या भारतीय टीममधील १०% कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि कॅनडामध्येही ही कर्मचारी कपात सुरू झाली असून, याचा सर्वाधिक फटका सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना बसला आहे.
India