‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या आत हल्ला करून अत्याधुनिक संरक्षण व्यवस्थेचे प्रदर्शन केले. MR-SAM, Akash, Spyder, आणि Barak-8 यांसारख्या प्रगत एअर डिफेन्स सिस्टम्सचा वापर करून शत्रूच्या प्रतिहल्ल्यांना निष्प्रभ केले.

नवी दिल्ली | प्रतिनिधी 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या अंतर्गत भागांपर्यंत लक्ष्य भेदले आणि हे करताना केवळ आक्रमकतेचा नाही, तर अत्याधुनिक संरक्षण व्यवस्थेचा परिचय जगाला करून दिला आहे. या कारवाईत भारतीय हवाई दलाने ज्या एअर डिफेन्स प्रणालींचा वापर केला, त्या जगातील प्रगत आणि अचूक मानल्या जातात. केवळ टार्गेटवर हल्ला करणे हा एक भाग होता, पण यामागे भारतातील ‘सिस्टेमॅटिक स्ट्रॅटेजी’ आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीचं सर्जिकल सिंक्रोनायझेशन अधिक महत्वाचं ठरतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान वापरलेली MR-SAM (Medium Range Surface to Air Missile) प्रणाली ही भारत-इस्रायल संयुक्त उपक्रमातून विकसित झालेली आहे. तसंच Akash, Spyder, आणि Barak-8 यांसारख्या एअर डिफेन्स सिस्टम्सचा प्रभावी वापर करण्यात आला, ज्यामुळे शत्रूपक्षाच्या प्रतिहल्ल्याला भारताने पूर्णतः निष्प्रभ केलं. ही कारवाई केवळ लष्करी शक्ती दाखवण्यासाठी नव्हती, तर "भारत आता कोणत्याही क्षेत्रात तडजोड करणार नाही," हे स्पष्ट करण्याचा संदेश होता. तंत्रज्ञान, रणनीती, आणि तत्परता या तिन्हींचं संमीलन म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’.

या कारवाईमुळे भारताची प्रतिमा केवळ एक रक्षणशील राष्ट्र म्हणून न राहता, "डिटरन्ससाठी तयार आणि अॅक्शनसाठी सक्षम राष्ट्र" म्हणून उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण विश्लेषक म्हणतात की, “हे ऑपरेशन म्हणजे भविष्यातील युद्धं तंत्रज्ञान, अचूक माहिती, आणि चाणाक्ष नियोजनावर अवलंबून असणार आहेत, याचा जीता जागता नमुना!