Mobile Data: एअरटेलचा ग्राहकांना मोठा झटका, रिचार्ज प्लॅन पुन्हा महागले!
Mobile Data: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या दरात वाढ केली आहे. कोणत्या प्लॅन्सच्या किमती वाढल्या आहेत आणि कोणता प्लॅन बंद झाला आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
14

Image Credit : x
एअरटेलने प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या
भारतात जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या खासगी कंपन्या आणि सरकारी कंपनी BSNL दूरसंचार सेवा पुरवतात. जिओ आणि एअरटेल वारंवार दर वाढवत असल्याने काही ग्राहक BSNL कडे वळत आहेत. अशातच, एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, एअरटेलने आपल्या लोकप्रिय 84-दिवसांच्या प्लॅनमध्ये बदल केला आहे. पूर्वी ₹859 असलेला हा प्लॅन आता ₹899 झाला आहे.
24
Image Credit : Airtel India/X
एक प्लॅन अचानक बंद
एअरटेलने आपला ₹799 चा प्लॅनही बंद केला आहे. त्यामुळे, ग्राहकांकडे स्वस्त पर्याय कमी झाले असून त्यांना आता जास्त खर्च करावा लागणार आहे. किंमत वाढली असली तरी, फायद्यांमध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 100 SMS मिळतील. प्लॅनची व्हॅलिडिटीसुद्धा 84 दिवसच आहे. म्हणजेच, त्याच सेवेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.
34
Image Credit : stockPhoto
दरवाढीचा फटका कुणाला?
या दरवाढीचा सर्वाधिक फटका लॉंग-टर्म प्लॅन्सने रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना बसेल. विशेषतः, जे ग्राहक दर महिन्याला रिचार्ज करण्याऐवजी 2-3 महिन्यांचे प्लॅन घेतात, त्यांना आता प्रत्येक वेळी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. बजेट प्लॅन्सना पसंती देणाऱ्या लहान शहरांमध्ये आणि गावांमध्येही याचा परिणाम जाणवेल. टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही केवळ सुरुवात आहे आणि लवकरच रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्याही आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवू शकतात.
44
Image Credit : Google
ग्राहकांना आणखी एक धक्का बसणार?
खरं तर, 5G नेटवर्कची उभारणी, पायाभूत सुविधा आणि वाढता ऑपरेटिंग खर्च यामुळे टेलिकॉम कंपन्यांवर खर्चाचा दबाव वाढला आहे. कंपन्या हा भार ग्राहकांवर टाकत आहेत. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून रिचार्ज प्लॅन्सच्या किमती सातत्याने वाढत आहेत. थोडक्यात, टेलिकॉम प्लॅन्स हळूहळू आणखी महाग होणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत, रिचार्ज करताना आपल्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडणे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे.

