मुंबईतील हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा काही काळासाठी ठप्प झाली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडकले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली आणि सकाळी ९ वाजता सेवा पूर्ववत झाली.

मुंबई | प्रतिनिधी – मुंबईतील प्रवाशांना आज सकाळी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं, कारण हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील ट्रेन सेवा सकाळच्या गर्दीच्या वेळी थांबली, ज्यामुळे हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले गेले. विशेषतः वाशी, मानखुर्द, चुनाभट्टी आणि कुर्ला स्थानकांवर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली, पण तोपर्यंत कामावर, शाळा, कॉलेज किंवा वैद्यकीय कारणासाठी नागरिकांचे मोठे हाल झाले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल यंत्रणेतील अपुऱ्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दररोज कोट्यवधी प्रवासी या रेल्वे सेवांवर अवलंबून असताना अशा प्रकारचे तांत्रिक बिघाड जीवघेणे ठरू शकतात. काही प्रवासींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ सूचना देण्यात आलेल्या नसल्याची तक्रार केली आहे.