कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण
महाराष्ट्रात कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. कलिंगडामुळे फूड पॉइजनिंग झाल्याचा दावा केला असून, गोडवा आणि लाल रंगासाठी ग्लुकोजचे पाणी टाकल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो.

कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कलिंगडामुळे चौघांचा झालेला मृत्यू चर्चेत आला आहे. त्यांनी बिर्याणी झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला का दुसरच काही कारण होत हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही.
रुग्णालयात नेल्यानंतर चौघांचा झाला मृत्यू
या चौघांना त्रास सुरु झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होत पण तिथंच त्यांचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाली कि दुसरं काही याचा अजूनही तपास मात्र लागलेला नाही.
कलिंगडामुळे फूड पॉइजनिंग झाल्याचा केला दावा
कलिंगड झाल्यामुळं फूड पॉइजनिंग झाल्याचा दावा एकला डॉक्टरने केला आहे. त्यांचा असं म्हणणं आहे की या प्रकरणात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवून त्यातच रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
ग्लुकोजचं पाणी टाकून कलिंगडाला येतो लाल रंग
कलिंगडमध्ये लाल रंगाची भडकता आणि गोडवा वाढवण्यासाठी त्यात ग्लुकोजच पाणी टाकलं जातं असे अनेक रिपोर्ट्स आहेत. त्यामुळंच तर हे झालं नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे.
अवयवांना होतो धोका निर्माण
शरीरातील पाणी कमी होऊन सेप्सीस होण्याची शक्यता असते. त्यामुळं शरीरातील महत्वाच्या अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं वैद्यकीय उपचार घेतले नाही तर संसर्ग निर्माण होतात.
वैद्यकीय उपचार किती वेळा होतात?
आपल्याला जर फूड पॉइजन झालं तर आपण अतिसार, उलटी आणि पोटात मळंमळ, क्रॅम्प असा त्रास होतो. बॅक्टोरिया कुठल्या प्रकारचा आहे, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती, वैद्यकीय उपचार किती वेळेत होतात? यावर गंभीरता अवलंबून असते.

