बदलापूर आंदोलनाचा मध्य रेल्वेला फटका, 30 लोकल गाड्या रद्द तर एक्सप्रेस खोळंबल्या

| Published : Aug 20 2024, 07:21 PM IST

badlapur protest  e
बदलापूर आंदोलनाचा मध्य रेल्वेला फटका, 30 लोकल गाड्या रद्द तर एक्सप्रेस खोळंबल्या
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बदलापुरातील एका शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी संतप्त नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली. आंदोलकांनी रेल्वे स्थानकात दाखल रेल्वे वाहतूक ठप्प केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या घटना घडून 6 दिवस झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलक मंगळवारी सकाळी आठ वाजता बदलापूर रेल्वे स्थानकावर जमले. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल रेल्वे वाहतूक ठप्प केली. सकाळी आठ वाजेपासून आंदोलकांनी रेल्वे सेवा ठप्प केली. आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत होती. पण आंदोलकांनी ऐकून घेतले नाही. जवळपास 10 तास रेल्वे वाहतूक ठप्प केली. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांच्या या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

बदलापुरातील आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. नागरिकांचे सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी आंदोलन सुरु होते. त्यामुळे अंबरनाथ ते खोपोली दरम्यान आतापर्यंत 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते अंबरनाथदरम्यान लोकसेवा सध्या सुरळीत सुरु आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस कल्याणवरुन वळवली आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेला आंदोलनाचा मोठा फटका

1. मध्य रेल्वेच्या 30 लोकल ट्रेन अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.

2. 11 लोकल गाड्या डायव्हर्ट (वळवण्यात) आल्या आहेत.

3. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस, व्हाया कल्याण चालवण्यात आली.

4. आतापर्यंत 10 मेल-एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे स्थानकावरुन वळवण्यात आल्या आहेत.

5. अंबरनाथ ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे.

आणखी वाचा :

बदलापूरमध्ये संतप्त जमाव आक्रमक, शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकावर दगडफेक