राज्यात प्रथमच एसटीडीच्या विशेष बस सेवेमुळे भाविकांना थेट गावातून पंढरपूरला जाण्याची सुविधा मिळणार आहे. एकूण ५ हजार २०० बसेस सोडण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, आरोग्य आणि नैतिक सुविधा यांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. खोट्या लाभार्थ्यांच्या नावावर सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे म्हटले जात आहे.
अहमदाबाद विमानतळावर कोसळलेल्या विमानाला पक्ष्यांचा थवा धडकला असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर १०० प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचल्याचे दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबईत शिवसेनेची ताकद जास्त आहे. एकूणच महापालिका निवडणूकांबद्दल शरद पवार नक्की काय म्हणाले जाणून घ्या…
आषाढी वारीसाठी प्रत्येक वर्षी भाविकांची फार मोठी गर्दी होत असते. अशातच यंदाच्या वारीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून पालखी मार्गावर चार ड्रोन कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.
धबधबे, धरणे आणि नद्यांच्या परिसरात दुचाकी, त्रिचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रवेश बंदीस्त आहे, केवळ आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी दिली जाईल.
हा आदेश पोलीस उपायुक्त (विशेष शाखा-१) तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी जारी केला असून, यामागील उद्देश पलखी मार्गावर संभाव्य अपघात टाळणे व जनतेच्या सुरक्षेची खात्री करणे असा आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट समोर आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणाकडे 58,585 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत हा विसर्ग आणखी वाढून 70,000 क्युसेकच्या वर जाऊ शकतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेसाठी हिंदुत्व आणि मराठी माणूस सोडल्याचा आरोप केला. २०१९ च्या निवडणुकीत मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणाले.
Maharashtra