शिळ्या जेवणावरून आमदार संजय गायकवाड आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. यामध्ये गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. कर्मचारी संघटनेने गायकवाडांवर कारवाईची मागणी केली आहे.
Raj Thackeray : मिरा-भाईंदरमधील मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कुणीही मीडियाशी संवाद साधू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत
Opposition Letter Cji Bhushan Gavai : विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने महाविकास आघाडीने सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले. विधानसभा अध्यक्षांवर घटनात्मक पद रिक्त ठेवल्याचा आरोप केला असून, ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळावे ही मागणी केली.
Mla Suresh Dhas Son Car Accident : आष्टीहून पुण्याकडे निघालेल्या आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून, अपघात सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
पुण्यात अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ते आपल्या गुन्ह्यांचे समर्थन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोलिस कोठडीत कसा तयार झाला आणि तो कसा लीक झाला यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Devendra Fadnavis on Mira Bhayandar MNS Morcha : मिरा-भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर CM देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. फडणवीसांनी सांगितले की, मनसेने जाणूनबुजून संघर्ष होण्याची शक्यता असलेला मार्ग निवडला होता.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावर टीका केली आहे. ते म्हणाले की हे विधेयक १९१९ च्या रोलेट कायद्यासारखे आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस 'औरंगजेबासारखे' आहेत.
अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला सडेतोड उत्तर देण्यासाठी ठाकरेंकडून मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाचे आवाहन करण्यात आले होते. पण त्याधीच पोलिसांनी धरपकड सुरू केली. अशातच प्रताप सरनाईक देखील मोर्चाच्या येथे निघत त्यांनी हिंमत असेल कर अडवा असे विधान केलेय.
महाराष्ट्रातील भाषिक वादावर हिंदुस्थानी भाऊनं आपलं मत व्यक्त केलं आहे. मराठी भाषेचा अभिमान असला तरी इतर राज्यातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं भाऊ म्हणाला. राज ठाकरेंना उद्देशून त्यानं हिंदुत्वाला एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली.
Maharashtra