नंदुरबार जिल्ह्यातील एका सीआरपीएफ जवानाने चुलत भावाच्या लग्नासाठी आलेली सुट्टी सोडून भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यासाठी आपल्या युनिटकडे परतण्याचा निर्णय घेतला. 

नंदुरबार – देशप्रेमाची व्याख्या पुस्तकी नाही, ती कृतीतून सिद्ध होते. आणि हेच दाखवून दिलं नंदुरबार जिल्ह्यातील एका सीआरपीएफ जवानाने. चुलत भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेला हा जवान, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कर्तव्याच्या हाकेस प्रतिसाद देत, आपल्या युनिटकडे रवाना झाला. आणि त्याचा निरोप झाला, वाजतगाजत नव्हे, तर देशभक्तीच्या सुरात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

घडलेलं साधं होतं 

जवान सुट्टीवर आला होता, लग्नात सहभागी होता, पण बातम्या आल्या की परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्याने निर्णय घेतला – उरलेली सुट्टी बाजूला ठेवायची आणि पुन्हा एकदा वर्दीत परतायचं. पण गावाने त्याचा निरोप दिला असा, की क्षणभर वाटावं – हा कोणताही सामान्य प्रवास नाही, तर एक ‘रणांगणावर निघालेल्या वीराचा निरोप’ आहे.

नातवंडं, वृद्ध आईवडील, आणि नातेवाईक अश्रूंनी डोळे भरून उभे होते. गावकऱ्यांनी त्याला देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर निरोप दिला. या संपूर्ण क्षणाने उपस्थित प्रत्येकाचं मन भरून आलं. हा केवळ एक जवान नव्हे, तर आजच्या तरुण पिढीचा आदर्श आहे — जो कुटुंबापेक्षा आधी देश ठेवतो.