Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असून हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईतील हवामानाबद्दलही हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. 

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर अनेक भागांत पावसाचा जोर वाढला गेला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज राज्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक भागांत खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुंबई, कोकणसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार,मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहणार आहे. याशिवाय हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

Scroll to load tweet…

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तळकोकणात पावसाची दांडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या पुनरागमनानंतर दोन दिवस चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. भाताच्या रोपांची लागवड उशिरा झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्याने शेती करण्यास सुरूवात केली आहे.