राज्यात २२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली असून पेरण्यांना वेग आला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी २७ जून ते १ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, परतीचा पाऊसही जोरात होणार असल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाला २२ जूनपासून सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. आता या मान्सूनमुळे पेरण्यांना वेग आला. २७ जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं आहे. २७ जूनपासून १ जुलैपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाला होणार सुरुवात
कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. या हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज वर्तवला आहे. २५ जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. परतीचा पाऊस जोरात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा पावसावर अल निनोचं सावट वर्तवलं आहे. पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार परतीचा पाऊस जोरात होणार आहे. त्यामुळं खरीप आणि रब्बी हंगामातील पिके चांगले येण्याची शक्यता आहे.


