MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Government Jobs: राज्यात मेगाभरतीचा मार्ग मोकळा! १० हजार अनुकंपा भरतीला मंजुरी, मात्र स्पर्धा परीक्षा समितीने व्यक्त केला विरोध

Government Jobs: राज्यात मेगाभरतीचा मार्ग मोकळा! १० हजार अनुकंपा भरतीला मंजुरी, मात्र स्पर्धा परीक्षा समितीने व्यक्त केला विरोध

Maharashtra State Government Jobs: महाराष्ट्र सरकारने राज्यभरात 10 हजार पदांवर अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती चतुर्थ श्रेणीतील विविध रिक्त पदांसाठी असून, 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 10 2025, 06:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : Getty

मुंबई: सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरात तब्बल 10 हजार पदांवर अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती लवकरच सुरू होणार असून, यात चतुर्थ श्रेणीतील विविध रिक्त पदांचा समावेश असेल.

25
Image Credit : Getty

राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं

राज्यात अनेक वर्षांपासून सरकारी नोकरभरती प्रक्रियेचा अभाव होता. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरले जात होते. मात्र, सरकारने आता खासगी कंत्राटी नोकरभरती थांबवून थेट पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरभरती देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Related image1
Aadhaar Update Charges : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती शुल्क लागते? कोणती कागदपत्रे लागतात?
Related image2
Construction Workers: बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची सूचना, आता मोबाईलवरच करा 'हे' काम; नाहीतर सरकारी लाभांना मुकाल!
35
Image Credit : Getty

अनुकंपा तत्व म्हणजे काय?

शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला सरकारी नोकरी देण्याची ही एक पद्धत आहे. यातून त्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व सामाजिक सुरक्षितता मिळते. याच तत्वावर आधारित भरतीचा निर्णय आता सरकारने घेतला आहे.

45
Image Credit : Getty

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सरकारला सवाल

या निर्णयावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “आम्ही वर्षानुवर्षे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतो, मग आमच्या जागा कोणाला फुकट द्यायच्या?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी सरकारकडे पारदर्शक आणि समान संधी मिळवून देणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे.

55
Image Credit : Getty

भविष्यातील नियोजन व सुधारणा

राज्य शासनाने अनुकंपा तत्वावरील या भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जापासून नियुक्तीपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी नवे मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या देखरेखीखाली राबवली जाणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nashik CCTV: धक्कादायक! शिक्षक गाडी चालवत असताना ६ वर्षांचा मुलगा आला गाडीखाली, पुढं काय झालं?
Recommended image2
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेच्या निकषांत होणार बदल? २०१९ नंतर जमीन घेणाऱ्यांनाही मिळणार लाभ? कृषीमंत्री दत्ता भरणे यांची मोठी घोषणा!
Recommended image3
नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाचा मार्ग मोकळा! ३० गावांतील जमिनींच्या संपादनाला वेग; पाहा संपूर्ण यादी
Recommended image4
Konkan Railway: कोकणचा प्रवास होणार आणखी सुखकर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठा बदल; वेटिंग लिस्टचं टेन्शन मिटणार!
Recommended image5
पुणेकरांच्या घशाला उन्हाळ्यापूर्वीच कोरड! वानवडीत पाणी कपातीचा 'शॉक'; पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू
Related Stories
Recommended image1
Aadhaar Update Charges : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती शुल्क लागते? कोणती कागदपत्रे लागतात?
Recommended image2
Construction Workers: बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची सूचना, आता मोबाईलवरच करा 'हे' काम; नाहीतर सरकारी लाभांना मुकाल!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved