मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरातील २० राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार सरी पडणार असून, काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा सूर्य आग ओकत होता, तेव्हा अचानक मेघांच्या गर्द जमवलं असल्यानं आभाळ भरून आलं आणि आता देशभरातील २० राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्येही मुसळधार सरी पडणार असून, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र हे केंद्रबिंदू ठरणार आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तापमानाचा पारा उतरू लागला असला, तरी या पावसाला मान्सूनपूर्व मानलं जाऊ नये, असा तज्ञांचा सल्ला आहे. हे बदल हवामानातील अस्थिरतेचं द्योतक असू शकतात, असं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी झाडाखाली थांबणे, उघड्यावर फिरणे किंवा मोबाईल वापरणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस आला तरी शेतकऱ्यांच्या आनंदात भीतीची दिसून आली आहे. काही ठिकाणी काढणीस तयार उभ्या पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे, तर दुसरीकडे खरीपपूर्व तयारीला गती मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन शेतीचे नियोजन करावं, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. शहरांमध्ये वाहतूक आणि वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

महापालिका आणि स्थानिक यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाहतुकीला अडथळे, खड्ड्यांचं पुनरागमन, आणि वीजपुरवठ्याच्या तक्रारी वाढू शकतात.