MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Farmer Accident Insurance Scheme : शेतकऱ्यांसाठी 'गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना', असा मिळवा योजनेचा लाभ

Farmer Accident Insurance Scheme : शेतकऱ्यांसाठी 'गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना', असा मिळवा योजनेचा लाभ

Farmer Accident Insurance Scheme : महाराष्ट्र शासनाच्या 'स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' अंतर्गत शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामुळे त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 16 2025, 09:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : Asianet News

मुंबई : शेतीत काम करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते.

25
Image Credit : Asianet News

योजनेचा इतिहास आणि महत्त्व

सुरुवात: ही योजना २००५-०६ मध्ये 'शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना' या नावाने सुरू झाली.

नाव बदल: २००९-१० मध्ये तिचे नाव बदलून 'शेतकरी जनता अपघात विमा योजना' करण्यात आले आणि २०१५-१६ पासून ती 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना' म्हणून ओळखली जाते.

उद्दिष्ट: शेतीत काम करत असताना होणारे अपघात, नैसर्गिक आपत्त्या (उदा. वीज पडणे, पूर), सर्पदंश, विजेचा शॉक यांसारख्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास धोक्याचे, १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
Related image2
FASTag Annual Pass: महाराष्ट्रातील 'या' 96 टोलनाक्यांवर मोफत प्रवासाची संधी!, जाणून संपूर्ण यादी
35
Image Credit : Asianet News

विमा दाव्याची प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

अर्ज सादर करणे: अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 30 दिवसांच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

प्रस्तावाची छाननी: तालुका कृषी अधिकारी अर्जाची छाननी करून पात्र प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवतात.

मंजुरी आणि मदत: तहसीलदार 30 दिवसांच्या आत मदत मंजूर करण्याचा निर्णय घेतात आणि पात्र कुटुंबाला अनुदान दिले जाते.

जर तालुका समितीने घेतलेला निर्णय मान्य नसेल, तर अर्जदार जिल्हास्तरावरील अपिलीय समितीकडे अपील करू शकतो.

45
Image Credit : Getty

या परिस्थितीत लाभ मिळणार नाही

खालील कारणांमुळे विमा नाकारला जाऊ शकतो.

जवळच्या नातेवाईकाने केलेला खून.

विमा कालावधीपूर्वी झालेला मृत्यू किंवा अपंगत्व.

स्वतःहून जाणूनबुजून स्वतःला जखमी करून घेणे.

मानसिक असंतुलनामुळे झालेला अपघात.

बाळंतपणात महिलेचा झालेला मृत्यू.

मोटार शर्यतीमधील अपघात.

शेतकरी सरकारी नोकरीत असल्यास.

55
Image Credit : iSTOCK

बीड जिल्ह्यात २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षात १७६ शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत, ज्यापैकी ६४ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १.२८ कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित ११२ प्रकरणांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच त्यांनाही मदत मिळण्याची शक्यता आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर अपघातानंतरही कोंडी कायम; 32 तासांचा हाहाकार, सरकारकडून चौकशीचे आदेश
Recommended image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image3
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image4
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image5
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास धोक्याचे, १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
Recommended image2
FASTag Annual Pass: महाराष्ट्रातील 'या' 96 टोलनाक्यांवर मोफत प्रवासाची संधी!, जाणून संपूर्ण यादी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved