पुणे, तोरण, सावनेर, ताम्हिणी घाट व आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जारी. पावसाची शक्यता, शेती व वारकऱ्यांना धोका. कोकण किनाऱ्यांवर उंच लाटा, मत्स्यव्यवसाय धोक्यात.

आज पुणे, तोरण, सावनेर, ताम्हिणी घाट व आसपासच्या गगांच्या भागात “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होणार आहे कारण आता या भागात पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि उंच वीजेबरोबर वाऱ्याची जोरदार हालचाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पावसामुळे शेतातील माती विस्कळीत होऊ शकते, पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

खडकवासल्यातील पाण्याचा विसर्ग कमी 

लोणावळ्यात 205 मिमी आणि ताम्हिणीत 370 मिमी इतका पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणाच्या विसर्गात घट दिसून आली आहे . मात्र, पुढील अति पावसाळा झाल्यास विसर्ग पुन्हा विसर्ग वाढवावा लागू शकतो. त्यामुळे पाणीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी धोक्याची घंटा 

आज काही भागात हलका पाऊस पडल्यानं पंढरपूरच्या वारकऱ्यांना काही प्रमाणात आराम वाटला असला तरीही आगामी काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वारकरीवर्गाच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पूर परिस्थितीची उपाययोजना तपासून पाहणी करणं गरजेचं आहे.

कोकण किनाऱ्यांवर उंच लाटा 

 मत्स्य उद्योग धोक्यात कोकण किनाऱ्यावर उंच लाटा असतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायावरही मोठा परिणाम होऊ शकतो. मत्स्य व्यवसाय करत असलेल्यांनी चाळी व प्रवासात प्रतिबंध घ्यावा लागेल; बचाव व सुचना यांचा कठोर अंमल करणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात मी मस्त्य व्यवसायावर परिणाम होत असतो, तसाच तो यावर्षी होत असल्याचं दिसून आलं आहे.