- Home
- lifestyle
- Agarbatti Rules : देवपूजा करताना किती अगरबत्त्या लावाव्यात? जाणून घ्या योग्य नियम काय आहे?
Agarbatti Rules : देवपूजा करताना किती अगरबत्त्या लावाव्यात? जाणून घ्या योग्य नियम काय आहे?
आपण देवाची पूजा करताना अगरबत्ती लावतोच. पण पूजा करताना खरंच किती अगरबत्त्या लावाव्यात? शास्त्र काय सांगतं?

देवाला किती अबरबत्ती लावाव्यात?
आपल्या सनातन धर्मात, दिव्यासोबत अगरबत्ती (धूप) लावण्याची एक पवित्र परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पूजेच्या वेळी अगरबत्तीचा सुगंध घरभर पसरतो आणि देवघरात एक शांत, प्रसन्न वातावरण तयार होतं. यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, असा अनेकांचा विश्वास आहे. पण देवापुढे नेमक्या किती अगरबत्त्या लावाव्यात? तज्ज्ञ काय म्हणतात?

मनातली श्रद्धा आणि शुद्धता जास्त महत्त्वाची
रोजच्या पूजेत एक किंवा दोन अगरबत्त्या लावल्या तरी पुरेसं आहे. पूजेमध्ये संख्येपेक्षा मनातली श्रद्धा आणि शुद्धता जास्त महत्त्वाची असते. जास्त अगरबत्त्या लावल्याने जास्त पुण्य मिळतं, असं कोणत्याही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. उलट, जास्त धूर झाल्यास घरात कोंदट वातावरण होतं आणि श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणातच केलेली बरी. अगरबत्तीचा सुगंध मनाला एकाग्र करून ध्यान किंवा जप करण्यासाठी मदत करतो. तसेच, तो घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि वातावरण शुद्ध करतो, असं मानलं जातं.

