Kitchen Hacks : भाज्या विकत आणल्यानंतर दोन दिवसांतच खराब होतात. योग्य प्रकारे साठवणूक न केल्यामुळे असे घडते. भाज्या साठवताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Kitchen Hacks : भाज्यांशिवाय स्वयंपाकघराचा विचारही करता येत नाही. अनेक दिवसांसाठी लागणाऱ्या भाज्या एकदम विकत घेऊन साठवून ठेवण्याची आपली पद्धत आहे. पण विकत आणल्यानंतर दोन दिवसांतच भाज्या खराब होऊ लागतात. योग्य प्रकारे साठवणूक न केल्यामुळे असे घडते. भाज्या साठवताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
हवा खेळती राहणाऱ्या पिशव्या
भाज्या कधीही बंद डब्यात किंवा पिशवीत ठेवू नयेत. यामुळे त्यात ओलावा टिकून राहतो आणि भाज्या लवकर खराब होतात. हवेशीर भांड्यात किंवा पिशवीत ठेवणे अधिक योग्य आहे. यामुळे ओलावा निर्माण होण्यास प्रतिबंध होतो आणि भाज्या खराब होण्यापासून वाचतात.
मुळांचे संरक्षण करा
गाजर, बटाटा, कांदा यांसारख्या भाज्या जास्त काळ चांगल्या राहाव्यात यासाठी त्या थंड आणि कोरड्या जागी ठेवाव्यात. गरज नसताना भाज्या फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. मुळांमध्ये ओलावा राहिल्यास भाज्या लवकर खराब होतात.
इथिलीन वायू सोडणारी फळे
केळी, सफरचंद यांसारख्या फळांमधून इथिलीन वायू बाहेर पडतो. ही फळे इतर भाज्यांसोबत ठेवल्यास त्या लवकर खराब होतात. त्यामुळे अशी फळे आणि भाज्या वेगळ्या ठेवण्याची काळजी घ्यावी.

पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा
लेट्यूस, पालक यांसारख्या पालेभाज्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. यामुळे त्यातील ओलावा शोषला जातो. तसेच भाज्या नेहमी ताज्या राहण्यास मदत होते.
साठवण्यापूर्वी धुऊ नका
वापरण्यापूर्वीच भाज्या धुवाव्यात. पण साठवण्यापूर्वी त्या धुण्याची गरज नाही. धुतल्यामुळे भाज्यांमध्ये पाणी राहते आणि त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते.
हे लक्षात ठेवा
योग्य पद्धतीने साठवणूक केल्यासच भाज्या खराब होण्यापासून वाचतात. भाज्या अनेक दिवस ताज्या ठेवण्यासाठी, त्या ओलावा नसलेल्या थंड ठिकाणी ठेवाव्यात.


