उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणता निर्णय घेणार?

| Published : Mar 19 2024, 05:50 PM IST / Updated: Mar 21 2024, 03:59 PM IST

Prakash Ambedkar
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणता निर्णय घेणार?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत किती जागा मिळणार याची जनतेला प्रतीक्षा लागून राहिली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत किती जागा मिळणार याची जनतेला प्रतीक्षा लागून राहिली आहे. जागावाटपाच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडी (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा मागितला आहे. या पत्राद्वारे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष एमव्हीएपासून दूर राहण्याचे संकेतही दिले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर मोठा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपले म्हणणे एकुण घेतले नाही, असं त्यांचं म्हणणं होते. आमच्या प्रतिनिधीला म्हणणं मांडून दिले जात नाही असा त्यांनी आरोप केला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागले त्यामुळे आपला विश्वास उडाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आमचे ध्येय - 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी व्हीबीए आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबत पुढे जाण्याबाबत बोलले आहे. आंबेडकर म्हणाले की, भाजप आणि आरएसएस युतीला सत्तेतून दूर करणे हे व्हीबीएचे एकमेव ध्येय आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात झालेल्या चर्चेत व्हीबीएला कोणत्याही पक्षाने निमंत्रित केले नसल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पत्रात काय लिहिले?
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, 17 मार्च रोजी मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप समारंभात तुम्हाला आणि राहुल गांधींना भेटून आनंद झाला. त्यावेळेस आम्ही सर्वसमावेशक संवादात सहभागी होऊ शकलो नसतो, म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाविकास आघाडीच्या कोणत्याही चर्चेत किंवा बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केला जात नसल्याचे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कोणत्याही बैठकीत व्हीबीए प्रतिनिधींना बोलावले तर त्यांचा एकही शब्द ऐकला जात नाही. दोन्ही मविआचे नेते ज्या पद्धतीने वागतात ते पाहिल्यानंतर दोन्ही पक्षांचा आमच्यावरचा विश्वास उडाला आहे. दोन्ही पक्षांचा दृष्टिकोन पाहून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला महाराष्ट्रातील 7 जागांवर पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा - 
पतंजलीच्या जाहिरातीतील दावे खोटे, सर्वोच्च न्यायालयाने आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना बजावले समन्स
सर्वोच्च न्यायालयाने सीएएवरील स्थगितीला दिला नकार, अधिक माहिती घ्या जाणून

Read more Articles on