बिहारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी, ३० मार्च रोजी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा (MLC) राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बिहारमधून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा (MLC) राजीनामा दिला आहे. इतकंच नाही, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. आता हे दोन्ही नेते राज्यसभेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. लवकरच नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा देणार असून, बिहारला नवे मुख्यमंत्री मिळतील, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांनी २९ शब्दांत पाठवला राजीनामा

नितीश कुमार यांनी फक्त २९ शब्दांत आपला राजीनामा पाठवला आहे. विजय चौधरी आणि आमदार संजय गांधी हे त्यांचं राजीनामा पत्र घेऊन विधान परिषदेत पोहोचले. दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी रविवारी बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. तो राजीनामा घेऊन सरावगी विधानसभेत पोहोचले आहेत. आता बिहारचे हे दोन्ही मोठे नेते वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत दिसणार आहेत.

नितीश कुमार आता दिल्लीचं राजकारण करणार

नितीश कुमार यांची १६ मार्च रोजी राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते लवकरच मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा देणार आहेत. यानंतर बिहारच्या भविष्यातील राजकारणावर पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चांना उधाण आलं आहे. कारण आता 'नितीश बाबू' केंद्राच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. राज्यसभेत गेल्यानंतर नितीश कुमार अशा काही मोजक्या नेत्यांच्या यादीत सामील होतील, ज्यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहांमध्ये काम केलं आहे.

नितीन नबीन यांची आईसाठी भावनिक पोस्ट

  • राजीनामा देण्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले:
  • आईची सावली आता नाही, पण तिची आठवण आजही तितकीच जिवंत आहे. गेल्या ५ वर्षांत अनेक पदं आणि प्रतिष्ठा मिळाली, पण त्या सगळ्यात एक पोकळी नेहमीच जाणवत राहिली. मी मंत्री झाल्यानंतर काही दिवसांतच आई आम्हा सर्वांना सोडून गेली. जणू काही ती त्याच दिवसाची वाट पाहत होती, मला आशीर्वाद दिला आणि तिच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेली.
  • आई असण्याचं आणि नसण्याचं दुःख कदाचित तेच लोक समजू शकतात, ज्यांनी आपली आई गमावली आहे. मित्रांनो, जोपर्यंत आई आहे, तोपर्यंत तिला पूर्ण सन्मान आणि वेळ द्या. जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आई. जोपर्यंत ती आहे, तिला नेहमी आनंदी ठेवा आणि पूर्ण वेळ द्या, कारण तिने जे दिलं आहे, ते तुम्हाला दुसरं कोणीही देऊ शकत नाही. आई तुमचा आत्मविश्वास आहे, आई प्रत्येक आनंद आहे, आई तुमची ऊर्जा आहे, जिच्यामुळे तुम्ही जगाशी लढता. आईच्या श्रीचरणी शतशः नमन.

Scroll to load tweet…