15 ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत देण्यासाठी दमदार भाषण

| Published : Aug 09 2024, 05:00 PM IST / Updated: Aug 09 2024, 05:03 PM IST

 Independence Day in chhattisgarh
15 ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत देण्यासाठी दमदार भाषण
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Independence Day 2024 Bhashan in Marathi : येत्या 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. अशातच 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण देण्याची तयारी करत असाल तर पुढील काही सोपे आणि दमदार भाषण नक्कीच कामी येऊ शकते.

Independence Day Speech : देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी भाषण देण्याची तयारी करत असाल तर पुढील काही सोपी भाषणे नक्कीच कामी येऊ शकतात.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची सुरुवात

माननीय प्राध्यापक, शिक्षक आणि माझ्या सर्व मित्रमैत्रीणींनो,

नमस्कार आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज, 15 ऑगस्ट 2024, आपल्या देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिवशी मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देण्याऱ्या शूरवीरांना सलाम करूयात. हा दिवस आपल्या देशाची महानता आणि त्याच्या विविधतेचा सन्मान करणारा आहे. आजचा दिवस आपल्या स्वातंत्र्याचेच प्रतीक नव्हे तर आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्याही आठवून देतो. आपल्या महान भारत देशाने गेल्या 78 वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्ण प्रगती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी आणि आंतराळसारख्या क्षेत्रांमध्ये देशाने आपले नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे.

स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेचा संदेश
यंदाचा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जाण्यासाठीचा आहे. सरकाराच्या योजना आणि नियम आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित करतात. स्वदेशी प्रोडक्ट्सचे उत्पादन आणि उपयोग आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा ठरणार आहे. यामुळे आपण स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन दिले पाहिजे. 'वोकल फॉर लोकल'चा मंत्रा लक्षात ठेवला पाहिजे.

डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञानात प्रगती
आपला देश डिजिटल इंडियाच्या रुपात जगभरात नवी ओखळ निर्माण करू पाहत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या कारणास्तव आज प्रत्येक नागरिकाच्या हातात एक सशक्त उपकरण आहे, ज्यामुळे जग एकमेकांच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटते. डिजिटल ट्रांजेक्शन ते शिक्षण, आरोग्यांच्या सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली आहे.

अंतराळात यशस्वी कामगिरी
भारताने काही अंतराळ मोहिमांचे आयोजन करत अंतराळात एक यशस्वी कामगिरी केली आहे. नासाने चंद्र आणि मंगळ ग्रहावर यशस्वीपणे मोहिमा केल्या आहेत. यंदाच्या वर्षी आपण चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाचा आनंद साजरा करतो. ही मोहिम आपली वैज्ञानिक क्षमता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.

आगामी आव्हाने आणि आपला संकल्प
आपल्या समोर अनेक आव्हाने देखील आहेत. जसे की, पर्यावरण संरक्षण, जलवायू परिवर्तन आणि सामाजिक भेदभाव. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला एकजूट व्हायचे आहे. आपण समजून घेतले पाहिजे की समाजाची सर्वांनी मिळून प्रगती करू शकतो. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि समानतेच्या क्षेत्रात आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.

आपल्या देशाची प्रगती
स्वातंत्र्याच्या या 78 वर्षांमध्ये देशाने मोठी प्रगती केली आहे. शिक्षण, खेळ, विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रात आपल्या देशाने जगात आपली एक वेगळी ओखळ निर्माण केली आबे. आज भारत सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यस्थेपैकी एक आहे. आपले वैज्ञानिक नवेनवे उपक्रम करतायत तर खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करत आहेत.

शाळा आणि शिक्षणाचे महत्व
आपण जे शिक्षण घेतोय ते या देशाचे भविष्य आहे. यामुळे सर्वांनी शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. एक उत्तम नागरिक होण्यासाछी उत्तम संस्कार, शिस्त आणि ज्ञानाची आवश्यकता असते. आपल्या शिक्षकांचे नेहमीच कर्तव्य असावे की, आपल्या विद्यार्थ्याने आयुष्यात योग्य मार्गावर चालावे. पालकांचे कर्तव्य म्हणजे मुलाला योग्य दिशा दाखवावी. पण सर्वाधिक महत्वाचे म्हणजे आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे. जेणेकरुन आई-वडील, शिक्षकांसह देशाची मान उंचावली जाईल.

देशभक्तीचा संदेश
आजचा दिवस नेहमीच अशी आठवण करुन देतो की, आपण सर्व भारतीय आहोत. एकमेकांसोबत मिळून राष्ट्राची सेवा करायची आहे. आपण कोणीही असो पण मातृभूमीवर सच्च्या मनाने आणि भावनेने प्रेम केले पाहिजे. स्वच्छता, ईमानदारी आणि दुसऱ्यांची मदत करणे देखील देशभक्तीचा महत्वपूर्ण भाग आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा शेवट
आजचा दिवस आपण देशाच्या स्वातंत्र्य सेनानींनी केलेला कामगिरीबद्दल पाहत आहोत. यामुळे स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयासाठी एक अनमोल दिवस असल्याचे नेहमीच लक्षात ठेवावे. भावी पिढीलाही एक समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन करावे. तर आपण सर्वांनी आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिळून संकल्प करुया की, देशाचा तिरंगा आणखी उंचउंच फडकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहूयात.

जय हिंद, वंदे मातरम्!

आणखी वाचा : 

Independence Day 2024 : मनामनातील देशभक्ती जागवणारे सिनेमातील 10 दमदार डायलॉग्स

स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा,' पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर 'हा' डीपी

Read more Articles on