बिग बॉस १९ मध्ये शहनाज गिलच्या भावाची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. सलमान खानने लोकांचे करिअर घडवण्याचे आणि संपवण्याचे आरोप फेटाळले आहेत.

सध्या बिग बॉस १९ ची चर्चा सुरु झाली आहे. या कार्यक्रमाचे दुसरे पर्व पूर्ण झालं आहे. सलमान खानने लोकांचे करिअर संपवल्याचे अनेकवेळा आरोप केले आहेत. बिग बॉस १९ च्या मंचावर विकेंड का वार च्या दरम्यान शहनाज गिलच्या भावाची वाईल्ड कार्डची एंट्री झाली आहे. शहबाज बदेशाची वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून झाली असून त्याच ७ वर्षांपासून येण्याचं स्वप्न होत असं म्हटलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शहनाज गिल उपस्थित राहिली 

शहनाज गिल ही यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. मागे काही काळापूर्वी बोलताना शहनाज गिल यांनी म्हटलं आहे की, सर त्याला काही काम असेल तर द्या. गेल्या ७ वर्षांपासून त्याच या शोमध्ये येण्याचं स्वप्न होतं. यावेळी ती सलमानला तो लोकांचं करिअर घडवतो असं म्हटलं आहे. यावर बोलताना सलमान खानने मत व्यक्त केलं आहे.

सलमान खान काय म्हणाला? 

सलमान खान पुढं बोलताना म्हटलं आहे की, कोणाचाही करिअर घडवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी जबाबदार नाहीये. सलमान पुढे म्हणाला, "लोक म्हणतात की किती लोकांना डुबवलं, महत्वाचं म्हणजे डुबवणे तर माझ्या हातात नाही. पण हल्ली असं म्हटलं जात की, करिअर संपवलं, मी कोणाचं करिअर संपवलं? जर संपवायचाच असेल तर तर मी माझं करिअर संपवेन.

करिअर घडवणं देवाच्या हातात असत 

सलमान खान म्हणाला, करिअर घडवणं देवीच्या हातात असतं. लोकांनी माझ्यावर मी इतरांचे करिअर संपवले असे आरोप केले. एकवेळ मी माझे करिअर संपवेल. लोक खूप चांगले आहेत आणि देव त्याच्याहून जास्त चांगला आहे. दिग्दर्शकाने अभिनव कश्यपने सलमान खांबद्दल गंभीर वक्तव्य केलं आहे. त्यानं अनुभव सांगत त्याच्या व खान कुटुंबावर टीका केली आहे.