राउडी बॉय विजय देवरकोंडासोबत लग्न? बातम्या व्हायरल, अखेर रश्मिकाने मौन सोडले
Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर आता रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे.

गीता गोविंदम, डिअर कॉम्रेडमध्ये एकत्र दिसले रश्मिका आणि विजय
राउडी बॉय विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. तेव्हापासून त्यांच्यात एक खास नातं निर्माण झालं. त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. पण, या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. बऱ्याच काळापासून त्यांच्या लव्ह स्टोरीच्या बातम्या येत आहेत.
डेटिंगबद्दल दिला होता इशारा
हे दोघे अनेकदा एकत्र सुट्टीवर गेले आहेत. अनेकवेळा ते एकाच वेळी विमानतळावर दिसले. इतकंच नाही, तर एकाच वेकेशनमध्येही ते एकत्र दिसले. त्यांनी त्या वेकेशनचे फोटो शेअर करून इशारा दिला होता. पण त्यांनी हे नातं गुपित ठेवलं. इतकेच नाही तर रश्मिका अनेकदा विजय देवरकोंडाच्या घरीही दिसली आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं.
रश्मिका आणि विजयचा गुपचूप साखरपुडा
दरम्यान, या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. विजयच्या घरी अत्यंत गुप्तपणे दोघांनी साखरपुडा केला होता. पण त्यांनी ही बातमी जाहीर केली नाही. अधिकृत घोषणा केली नाही. त्यांनी ते गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
फेब्रुवारीमध्ये लग्न
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न करणार असून, हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, अशी चर्चा आहे. एवढं सगळं होऊनही कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी या बातम्यांचं खंडनही केलेलं नाही. त्यामुळे हे खरं असल्याचं सर्वांनी ठरवलं आहे. त्यांनी उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन केल्याचं म्हटलं जात आहे.
विजयसोबत लग्न, रश्मिका काय म्हणाली?
या पार्श्वभूमीवर, नुकत्याच एका मुलाखतीत तिला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'माझ्या लग्नाबद्दल अनेकदा अफवा पसरत असतात. प्रत्येकजण आपापल्या मर्जीप्रमाणे बोलत असतो. लग्न हा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे. वेळ आल्यावर मी यावर बोलेन. मी लग्न करेन तेव्हा सर्वांना सांगूनच करेन.' तिने खूप हुशारीने उत्तर दिले. तिने या बातमीत तथ्य नाही असे म्हटले नाही किंवा बातमीचे खंडनही केले नाही. वेळ आल्यावर ती स्वतःच जाहीर करेल, असे रश्मिकाने सांगितले. तिने अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा इशारा दिला आहे, असे म्हणता येईल.

