Kitchen Tips: माशांचं कालवण फ्रिजमध्ये किती दिवस टिकतं? या टिप्स लक्षात ठेवा!
Kitchen Tips: माशांचं कालवण (Fish Curry) दुसऱ्या दिवशी खाल्लं की जास्त चविष्ट लागतं, हे खरंय. पण फ्रिजमध्ये ठेवलेलं हे कालवण किती दिवस खाण्यासाठी सुरक्षित असतं? ते कसं साठवून ठेवावं? याबद्दलची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी.
14

Image Credit : stockphoto
फ्रिजमध्ये किती दिवस कालवण ठेवावे ?
इतर पदार्थांपेक्षा माशांच्या कालवणाची एक खासियत आहे. ते ताजं खाण्यापेक्षा एक दिवस मुरल्यावर जास्त चविष्ट लागतं. त्यामुळे अनेकजण जास्त प्रमाणात कालवण बनवून फ्रिजमध्ये ठेवतात. पण ते किती दिवस खाण्यासाठी सुरक्षित आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेलं माशांचं कालवण (Fish Gravy) किती दिवस टिकतं आणि ते खाताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती इथे दिली आहे.
24
Image Credit : stockphoto
माशांचं कालवण फ्रिजमध्ये ३-४ दिवस ठेवू शकता
साधारणपणे, तुम्ही माशांचं कालवण फ्रिजमध्ये ३-४ दिवस ठेवू शकता. यापेक्षा जास्त दिवस ठेवल्यास त्यातील प्रोटीन्सचं विघटन होतं, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे ४ दिवसांनंतर ते कालवण खाणं टाळावं. डीप फ्रीझरमध्ये ठेवल्यास ते आठवडाभर टिकेल, पण त्याची चव कमी होते. कालवणात आपण चिंच वापरतो, जी नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह (Preservative) म्हणून काम करते आणि कालवण लवकर खराब होऊ देत नाही.
34
Image Credit : stockphoto
कालवण गरम असताना थेट फ्रिजमध्ये ठेवू नका
कालवण गरम असताना थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे फ्रिजमधील आर्द्रता वाढते आणि इतर पदार्थ खराब होऊ शकतात. कालवण फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी काचेच्या किंवा चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकच्या एअर-टाइट डब्यांचा वापर करा. यामुळे माशांचा वास फ्रिजमधील इतर पदार्थांना लागत नाही. फ्रिजमधून काढलेलं कालवण थेट जेवणात घेऊ नका. तुम्हाला जेवढं हवं आहे, तेवढंच दुसऱ्या भांड्यात काढून गरम करा. संपूर्ण कालवण वारंवार गरम केल्यास त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात आणि माशांचे तुकडे तुटतात.
44
Image Credit : our own
2-3 दिवसांत कालवण संपवा
जर कालवणावर पांढरा थर दिसला, ते चिकट वाटलं किंवा त्यातून विचित्र वास येत असेल, तर ते खराब झालं आहे असं समजा. असं अन्न खाल्ल्यास उलट्या, जुलाब आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात. माशांचं कालवण चवीसाठी मुरवणं चांगलं आहे, पण ते आरोग्याच्या मर्यादेतच असावं. शक्यतोवर २-३ दिवसांतच ते संपवणं उत्तम.

